Odisha Train Tragedy: अपघातानंतर शाळेत जाण्यास का भीत आहेत विद्यार्थी? जाणून घ्या यामागचे कारण...

Coromandel Express: बालासोर अपघातात तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये सुमारे 300 प्रवाशी बळी पडले होते.
Odisha Train Tragedy
Odisha Train TragedyDainik Gomantak

Odisha Railway Accident :

ओडिशातील बहनगा हायस्कूलचे विद्यार्थी त्यांच्या शाळेत परतण्यास घाबरत आहेत. रेल्वे अपघातानंतर या शाळेत मृतदेह ठेवण्यात आले होते. 2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर लगेचच या ६५ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीत कापडांमध्ये गुंडाळलेले मृतदेह ठेवण्यात आले. विद्यार्थी आता या शाळेत येण्यास टाळाटाळ करत असून शाळा व्यवस्थापन समितीने (एसएमसी) ही इमारत जुनी असल्याने ती पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

बहनगा हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी कबूल केले की, “विद्यार्थी घाबरले आहेत. त्यादृष्टीने येथे धार्मिक कार्यक्रम व पूजा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ते म्हणाले की शाळेतील काही विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट देखील बचाव कार्यात सामील झाले आहेत.

शाळा आणि जनशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार गुरुवारी शाळेला भेट देणारे बालासोरचे जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय शिंदे म्हणाले, “मी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, इतर कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. त्यांना जुनी इमारत पाडून ती दुरुस्त करायची आहे जेणेकरून मुलांना वर्गात जाताना भीती वाटू नये.

Odisha Train Tragedy
Odisha Railway Accident : कुठे विखुरलेली खेळणी, तर कुठे प्रेमाच्या कविता... अपघाताचे असे दृश्य तुम्ही कधीच पाहिले नसेल!

मुलांनी टीव्हीवर पाहिले शाळेत ठेवलेले मृतदेह

एसएमसीच्या एका सदस्याने जिल्हा दंडाधिकार्‍यांना सांगितले की, शाळेच्या इमारतीत ठेवलेले मृतदेह टीव्हीवर पाहिल्यानंतर, "मुलांवर परिणाम झाला आहे आणि 16 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होईल तेव्हा ते येण्यास तयार नाहीत". शाळेतील मृतदेह हलवल्यानंतर तेथे साफसफाई झाली आहे, पण विद्यार्थी आणि पालक घाबरले आहेत.

मुलांना शाळेत पाठवायला पालक तयार नाही

एका विद्यार्थ्याने सांगितले, “आमच्या शाळेच्या इमारतीत इतके मृतदेह ठेवण्यात आले होते हे विसरणे कठीण आहे.” एसएमसीने सुरुवातीला केवळ तीन वर्गखोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्याची परवानगी दिली. नंतर जिल्हा प्रशासनाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी शाळेच्या सभागृहाचा वापर केला. सुजित साहू या पालकाने सांगितले की, "आमची मुले शाळेत जाण्यास नकार देत आहेत आणि त्यांच्या आई आता त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाठवण्यास तयार नाहीत."

Odisha Train Tragedy
Odisha Train Accident: पतीच्या मृत्यूचा बनाव महागात; पत्नीविरुद्ध पतीने दाखल केला गुन्हा

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधला

काही पालकही आपल्या मुलांना बहनगा विद्यालयात पाठवण्याऐवजी दुसऱ्या शाळेत पाठवण्याचा विचार करत आहेत.

दरम्यान, बालासोरचे जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) बिष्णू चरण सुतार यांनी एसएमसी आणि माजी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही नकारात्मक विचारांना प्रोत्साहन देऊ नये यासाठी प्रवृत्त केले. ते म्हणाले, "यामुळे कोणताही विद्यार्थी शाळा सोडणार नाही याची आम्ही खात्री करू."

डीईओ म्हणाले की, रेल्वे अपघातादरम्यान बचाव आणि मदत कार्यात शाळा आणि स्थानिक लोकांनी खूप योगदान दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी एसएमसीला इमारत पाडून सरकारला सादर करण्याच्या त्यांच्या मागणीबाबत ठराव करण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com