Odisha Train Accident: पतीच्या मृत्यूचा बनाव महागात; पत्नीविरुद्ध पतीने दाखल केला गुन्हा

Coromandel Express Accident: कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथील गीतांजली दत्ताने दावा केला होता की तिचा पती विजय दत्ता यांचा 2 जून रोजी अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांनी एक मृतदेह तिच्या पतीचा असल्याचा दावा केला होता.
Odisha Train Tragedy
Odisha Train TragedyDainik Goomantak

Odisha Train Tragedy: ओडिशा राज्य सरकार आणि रेल्वेने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईच्या रोख रकमेसाठी बालासोर रेल्वे दुर्घटनेत पतीच्या मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न करणारी महिला अडचणीत आली आहे.

कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथील गीतांजली दत्ताने दावा केला होता की तिचा पती विजय दत्ता यांचा 2 जून रोजी अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांनी एक मृतदेह तिच्या पतीचा असल्याचेही ओळखले होते. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तिचा दावा खोटा असल्याचे आढळून आले.

Odisha Train Tragedy
PM Modi अमेरिकेत रचणार इतिहास; अशी कामगिरी करणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान

पोलिसांनी तिला ताकीद देऊन सोडले असले तरी तिच्या पतीने मनिबांध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिची खरी अडचण झाली. अटकेच्या भीतीने ही महिला आता फरार झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

 पोलिसांनी सांगितले की, हे जोडपे गेल्या 13 वर्षांपासून वेगळे राहत होते. सरकारी पैसा हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यांच्या मृत्यूचा बनाव केल्याबद्दल बिजयने गीतांजलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Odisha Train Tragedy
Crime News UP : लखनौच्या कैसरबाग कोर्टात रक्तरंजित थरार; गँगस्टर संजीव जीवाची गोळ्या झाडून हत्या

मनियाबांदा पोलिस स्टेशनचे प्रभारी बसंत कुमार सत्पथी यांनी सांगितले की, पोलिसांनी गीतांजलीच्या पतीला बालासोर जिल्ह्यातील बहनगा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना मृतदेहांवर खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याआधी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना  5 लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  2 लाखांची भरपाई जाहीर केली होती. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना  10 लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता एका मालगाडीला धडकली, तिचे बहुतेक डबे रुळावरून घसरले. एकूण 288 लोक या अपघातात मरण पावले आणि 1,200 हून अधिक जखमी झाले.

 कोरोमंडलचे काही डबे एकाच वेळी जात असलेल्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या शेवटच्या काही डब्यांवरून घसरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com