गोवा सरकार पर्यावरण संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत असून एका वर्षाच्या कालावधीत राज्यात 5 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि राज्याचा हरित आच्छादन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री राणे यांनी सांगितले की, वाढत्या शहरीकरणामुळे आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. यामुळे हवामानातील बदलांचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.