पणजी: गोव्यात सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहेत. घरगुती हिंसाचार वाढत असल्याने घटस्फोटांच्या अंकांत वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्ष रणजिता पै यांनी काही करणं नमूद केली आहेत. नवरा-बायकोमध्ये वाद, आर्थिक अडचणी, नवऱ्याचं दारू पिऊन घरी येणं, घरच्यांमध्ये गैरसमज इत्यादी प्रमुख कारणं त्यांनी नमूद केली आहेत. गेल्या वर्षभरात २८७ प्रकरणांची नोंद झाली असून २०२३-२४ या कालावधीत ८३ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. गोव्यात शिक्षणाचा स्थर मोठा असला तरी देखील मुली म्हणावं तसं कमावताना किंवा नोकरी करताना दिसत नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज असल्याचं रणजिता पै म्हणाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.