Why was his first marriage with Amrita Singh broken, Saif Ali Khan told this shocking reason
Why was his first marriage with Amrita Singh broken, Saif Ali Khan told this shocking reason  Dainik Gomantak
मनोरंजन

सैफ अली खानचा आणि अमृता सिंगचा 'या' कारणामुळे झाला होता घटस्फोट

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमध्ये विवाह आणि घटस्फोट हे सामान्य आहेत. इथे जितक्या लवकर लग्न होईल तितक्या लवकर ब्रेकअप होते. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांचे नातेही असेच होते. दोघांचे लग्न 1991 मध्ये झाले. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते पण त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केले. यानंतर सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) झाले.

लवकरच सैफ आणि अमृताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.त्यामुळे त्यांचे नाते कायमचे तुटले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफने एका मुलाखतीत सांगितले होते की, अमृताचे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाशी असलेले वागणे बदलले होते. ती त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा आणि सबा यांना खूप मेंटॉर करायची आणि त्यांना वाईट बोलायची.

इतकंच नाही तर सैफच्या म्हणण्यानुसार, अमृता त्याला सतत टोमणे मारायची आणि त्याचा अपमान करायची. तो एक वाईट नवरा आणि वाईट बाप असल्याची ती त्याला प्रत्येक क्षणी जाणीव करून देत असे. या गोष्टींना कंटाळून त्याने अमृतापासून घटस्फोट घेतला.

अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी सैफने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. दोघेही लग्नाच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आता सैफ-करीनाला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT