Jalsa Movie Poster  Dainik Gomantak
मनोरंजन

विद्या बालनच्या 'जलसा' चित्रपटाची 'रिलीज डेट' ठरली

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार 'जलसा'चा जागतिक प्रीमियर

दैनिक गोमन्तक

प्राईम व्हिडिओने 'जलसा' या ड्रामा थ्रिलर चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. विद्या बालन या चित्रपटात झळकणार आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित, जलसा अबुदंतिया एंटरटेनमेंट आणि टी-सीरीज यांनी निर्मित केला आहे.

जलसा ही एक पत्रकार आणि त्याचा स्वयंपाकी यांच्या जीवनातील संघर्षाची अतिशय आकर्षक आणि मनमोहक कथा आहे. यापूर्वी सुरेश त्रिवेणी आणि विद्या बालन (Vidya Balan) यांनी 'तुम्हारी सुलू' या चित्रपटासाठी (Movie) एकत्र काम केले होते. 'जलसा'चा जागतिक प्रीमियर 18 मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वर भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये होणार आहे.

अ‍ॅमेझॉन (Amazon) प्राइम व्हिडिओचे कंटेंट लायसन्सिंग हेड मनीष मेंघानी म्हणाले, “प्राइम व्हिडिओमध्ये कथा निवडताना सत्यता आणि ताजेपणा पाहणे हे मुख्य तत्त्व आहे. सूक्ष्म आणि पारंपारिक कथाकथनाच्या पलीकडे जाणाऱ्या कथा देशभरातील प्रेक्षकांना आवडतात. नाटक आणि थरार यांच्या परिपूर्ण मिश्रणात, जलसा खऱ्या अर्थाने एक वेगळी गोष्ट आहे.

अबुदंतिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि सीईओ विक्रम मल्होत्रा ​​म्हणाले, “आमचा मुख्य फोकस नेहमी अशा कथा सांगण्यावर असतो ज्या सिनेमाच्या पारंपारिक नियमांच्या पलीकडे असतात. जलसाचा जागतिक प्रीमियरसाठी मी उत्सुक आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT