Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan: सलमानने सांगितले 'या' 2 चित्रपटांच्या अपयशाचे कारण ?

Salman Khan: सलमानने माध्यमांशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Salman Khan: नुकताच प्रदर्शित झालेल्या टायगर ३ या सलमानच्या चित्रपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सलमानच्या गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

सलमानने माध्यमांशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की “किसी का भाई किसी की जान’’ आणि अंतिम हे दोन्हीही चित्रपट टायगर ३ च्या आर्थिक यशाशी तुलना करु शकले नाहीत.

या मुलाखतीदरम्यान सलमानने बॉक्स ऑफिसवरील कमाई आणि मुल्य निर्धारण,रणनिती अशा अनेक विषयावर चर्चा केली. सलमान म्हणाला जेव्हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा बॉक्सऑफिसवरील मुल्य निर्धारण केले नसल्याचे सांगितले.

सलमानने ‘’ किसी की भाई किसी की जान’’ आणि अंतिम चित्रपट(movie) प्रदर्शित करण्याची तारीख आणि वेळेला जबाबदार धरले आहे. हे दोन्ही चित्रपट आताच्या घडीला प्रदर्शित झाले असते तर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंती दिली असती असे त्याने म्हटले आहे.

यावेळी पीव्हीआर मधील लोकांनी सलमानशी संवाद साधला ते म्हणाले की चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जवळपास २५ ते ३० % टक्के कमी झाली आहे. तसेच मॉलमध्ये तर त्यापेक्षा कमी असल्याचे सांगितले.

त्यावेळी सलमान म्हणाला की मी काही सुपरस्टार नाही, डीओपी आणि पटकथा लेखक आणि वांद्रेमधील अनेक लोक आहेत ज्यांनी या मुलाला सुपरस्टार करण्यास मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Margao Crime: 'चोरी नव्हे, हा तर खुनाचा प्रयत्न'! मडगाव दुर्घटनेवरून प्रभाव नायक आक्रमक; तातडीने कारवाईची केली मागणी

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

अग्रलेख: गोव्याच्या किनाऱ्यांवर वरवर 'निळा समुद्र' दिसतो; परंतु त्याखाली 'नशेचे काळे पाणी' खदखदत आहे..

SCROLL FOR NEXT