Javed Akhtar  Dainik Gomantak
मनोरंजन

जावेद अख्तर बनले Fake news चे शिकार , लखनौ पोलिसांची बनावट प्रेस रिलीज केली शेअर

Uttar Pradesh News: लखनौमधील लुलू मॉल उद्घाटन झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: लखनौमधील लुलू मॉल उद्घाटन झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातच आता प्रसिध्द गीतकार जावेद अख्तरही या वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. त्यांनी लखनौ पोलीस आयुक्तालयाची बनावट प्रेस रिलीज आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली आहे. नमाज अदा केल्यानंतर पोलिसांनी चार मुस्लिमांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटकाही केली. जावेद अख्तर यांनी शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये चारपैकी तीन नावे सरोज, कृष्णा आणि गौरव हिंदू आहेत.

दरम्यान, जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या ट्विटर हँडलवर बनावट रिलीज पाहून लोक चांगलेच संतापले. प्रभात उपाध्याय या यूजर्सने लिहिले की, 'जावेद अख्तर जी, आरोपींची योग्य नावे पुढीलप्रमाणे आहेत. मोहम्मद रेहान, आतिफ खान, मुहम्मद लोकमान आणि मोहम्मद नोमान. तुम्ही तथ्यांची तपासणी केली नाही.' जावेद अख्तर यांना टॅग करत, पोलिसांची (Police) मूळ प्रेस रिलीजही उपाध्याय यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

दुसरीकडे, एम श्रीवास्तव नावाच्या युजरने लिहिले की, 'कृपया त्यांना योग्य माहिती द्या. दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT