FIR against Amitabh Bachchan 
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्याविरूद्ध एफआयआर

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई : कौन बनेगा करोडपती चे निवेदक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही शोच्या निर्मात्यांविरूद्ध शुक्रवारी 'करमवीर' या विशेष एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नासाठी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अभिनेता अनुप सोनी आणि सामाजिक कार्यकर्ते बेजवाडा विल्सन हे या विशेष भागात सहभागी झाले होते.

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे. 
मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी हा वादग्रस्त प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी विचारला ज्याने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले.

हा वादग्रस्त प्रश्न असा होता:

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बी.आर. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?
पर्याय असेः
(अ) विष्णू पुराण (ब) भगवद्गीता, (क) ऋग्वेद (डी) मनुस्मृती
उत्तर मनुस्मृती म्हणून घोषित करतांना बिग बी यांनी स्पष्ट केले की डॉ. आंबेडकर यांनी पुरातन हिंदू ग्रंथाच्या प्रती जाळल्या.

पर्यायांमध्ये इतरही धर्म यायला हवे होते. परंतु विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. बाकीच्या धर्मांच्या ग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही?” असा सवाल अभिमन्यू पवार यांनी केला. या घटनेनंतर केबीसी वर टिका होत असून, हा कार्यक्रम डाव्या विचारसरणीचा प्रसार करतो, असे आरोपदेखील होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT