Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील : मुख्यमंत्री ठाकरे

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचे प्रकार घडले आहेत. परिणामी अनेक काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray Kashmiri Pandit)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.”

ठाकरे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे."
केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन काश्मिरी पंडितांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Today's Live News: सुकूर येथे ट्रक आणि कारचा अपघात

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT