Uddhav Thackaray Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा 'गट अ' आणि 'गट ब' अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय!

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिमध्ये 'गट अ' आणि 'गट ब' मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे अनुकंपाचे धोरण लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackaray) यांनी मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकिय सेवेमध्ये असलेल्या 'गट क' आणि 'गट ड' कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी देण्यात येते. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिमध्ये 'गट अ' आणि 'गट ब' मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे अनुकंपाचे धोरण लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान कोरोना (Coronavirus) काळात राज्यात बऱ्याच शासकिय अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनेने राज्यात अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अनुकंपा धोरणाचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडऴाच्या बैठकित मांडण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक परिस्थितीमधून दिलासा दिलासा मिळणार आहे.

तसेच, गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबामधील पात्र सदस्यास अनुकंपा तत्वावर गट क किंवा गट ड मधील नोकरी देण्यात येईल असा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठी आदेश एकत्रित करत महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता अनुकंपा संदर्भातील प्रशासकिय अडचणी दूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT