Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

''कोटी - कोटी रुपयांच्या घोडेबाजारामागे सूत्रधार कोण ?''

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

दैनिक गोमन्तक

राज्यसभा निवडणुकीला अवघे सात दिवस बाकी असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार आपल्याकडे कसे राहतील यासाठी शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच निवडणुकीसाठी घोडेबाजारचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरुन शिवसेना नेत संजय राऊत यांनी ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (ShivSena leader Sanjay Raut criticizes BJP)

याबाबत बोलताना राऊत म्हणआले की, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाईट पद्धतीने घोडेबाजार सुरू आहे. यासाठी राजकारणात पैसा येतो कुठून ? याचा तपास ईडीने करावा आमदारांना अमिष दाखवत त्यांना विकत घेण्यासाठी पैशाची प्रलोभन दाखवली जात आहेत. ही प्रलोभन दाखवणारे कोण आहेत ? कोटी कोटी रुपयांचे आकडे मी ऐकत आहे. त्यामागचे सूत्रधार कोण आहेत ? केंद्रीय तपास यंत्रणेने त्याचा अभ्यास करणं गरजेच आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

राज्यसभा बिनविरोध होण्यासाठी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं, यावेळी ते म्हणाले की, विरोधी फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आधीच राज्यातील राजकीय वातावरण गढूळ आणि प्रदूषित झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता वाटत आहे. विरोधी पक्ष नेत्यांना भेटून राज्याच्या प्रतिष्ठेसाठी काही चांगले होणार असेल तर त्याचं स्वागत सर्वांनी केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT