Sharad Pawar criticize congress Dainik Gomantak
महाराष्ट्र

काँगेस म्हणजे जमीन गमावलेली जमीनदार;शरद पवारांची बोचरी टीका

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, जर काँग्रेसने हे सत्य स्वीकारले तर इतर समविचारी पक्षांशी जवळीक वाढेल.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या मित्रपक्ष काँग्रेसला (Congress) आरसा दाखवला आहे , त्यांच्या नेतृत्वाला हे मान्य करावे लागेल की त्यांचा आता पूर्वीसारखा प्रभाव राहिला नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत (Kashmir to Kanyakumari) एकेकाळी प्रभाव असणारा पक्ष आता काँग्रेस राहिलेला नाही, असे पवार म्हणाले.यासोबतच त्यांनी काँग्रेसला वास्तव स्वीकारून राजकारण करण्याचे संकेत दिले. शरद पवार म्हणाले, 'एक काळ होता, जेव्हा काँग्रेसचा प्रभाव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असायचा. पण आज तसे नाही. आणि त्यांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे.(Sharad Pawar criticize congress)

एवढेच नव्हे तर शरद पवार म्हणाले की, जर काँग्रेसने हे सत्य स्वीकारले तर इतर समविचारी पक्षांशी जवळीक वाढेल. इंडिया टुडे ग्रुपच्या मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म मुंबई तकशी बोलताना शरद पवार म्हणाले की , "जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न येतो तेव्हा माझे काँग्रेसचे सहकारी इतर कोणतेही मत स्वीकारण्याच्या स्थितीत नसतात."शरद पवार म्हणाले की, जेव्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधी पक्षनेत्या असल्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा काँग्रेसने त्यांच्याकडे राहुल गांधी असल्याचे सांगितले. पवार म्हणाले की, सर्व पक्ष आणि विशेषत: काँग्रेसमधील माझे मित्र नेतृत्वाबाबत इतर कोणतेही मत स्वीकारण्यास तयार नाहीत.

काँग्रेस अशी जमीनदार आहे, ज्याची शेतीही केली गेली आहे आणि हवेली वाचवणे कठीण आहे.

हा काँग्रेसचा अहंकार आहे का, असे विचारले असता. शरद पवार म्हणाले की, आजकाल काँग्रेस एका जमींदारासारखी आहे ज्याने आपली सर्व जमीन गमावली आहे आणि आता तो आपल्या हवेलीचे संरक्षण करण्यासही असमर्थ आहे. शरद पवार म्हणाले की मी यूपीच्या जमीनदारांबद्दल एक कथा सांगेन, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमीन होती आणि मोठा वाडा होता.परंतु सीलिंग कायद्यामुळे त्यांची जमीन गेली आणि वाडा शिल्लक राहिला आहे जो त्यांच्यासाठी देखरेख करणे एक आव्हान बनले असून हवेलीची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची क्षमताही त्याच्याकडे नव्हती.आणि आता काँगेस त्याच अवस्थेतून जात आहे.

काँग्रेसचा पलटवार

“त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.” असे म्हणत काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT