Raj Thackeray
Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

''शरद पवारांना 'हिंदू' शब्दाचीचं अ‍ॅलर्जी'', राज ठाकरेंचा घणाघात

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर वादाभोवती फेर धरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील राजकारण हदरवून सोडले होते. यानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले. (Raj Thackeray criticized Sharad Pawar)

दरम्यान, लाऊडस्पीकरच्या मुद्याने महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राजकारण ढवळून निघालं. या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरली असल्याचा आरोप देखील राजकीय विरोधकांकडून करण्यात आला. जोपर्यंत मशिदीवरुन लाऊडस्पीकर हटवले जात नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही, असे आवाहन राज ठाकरेंनी राज्य सरकारलं केलं होतं. त्यानंतर सत्ताधारी नेते आणि मनसेमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. राज ठाकरे भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला. यातच आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा पार पडली. ज्याकडे महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांचा लक्ष लागलं होतं. राज ठाकरेंनी या सभेतून चार तारखेपर्यंत मशिदीवरुन लाऊडस्पीकर हटवण्यात यावेत असे आवाहन देखील केले.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ''इथे जमलेल्या तमाम मन सैनिकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्यातील विरोधकांनी आमच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर मी गुढीपाडव्याच्या सभेला उत्तर म्हणून उत्तर सभा घेतली, त्यानंतरही राज्यातील विरोधकांनी माझ्यावर टीका केली. आता मी राज्यातील प्रत्येत जिल्ह्यात सभा घेणार आहे. त्यामुळे ज्यांना काही रोखायचं असेल त्यांनी रोखून दाखवावं. महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं प्रश्न आवासून आपल्या समोर उभा आहे. आज या संभाजीनगरमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आज मी आपल्या समोरच्या समस्यांनाच घेऊन बोलणार आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास विसरला त्यांच्या पायाखालून महाराष्ट्राचा भूगोल देखील निसटून गेला. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आपण पुन्हा एकदा नव्याने समजून घेतला पाहिजे. तसेच, मनसेच्या सभेमध्ये वेडं वाकडं करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा चौरंग केला जाईल. त्याचबरोबर भाषणात व्यत्यत आणणाऱ्याला तिथेच हाणा.''

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्याचा अर्थ समजवला. स्वाभीमानानं कसं जगायचं हे देखील आपल्याला महाराजांनी शिकवलं. औरंगजेबाला त्यावेळी खऱ्या अर्थाने कळालं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर विचार आहे. मात्र आज आपण या महापुरुषांच्या केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर मांडला.''

ठाकरे असेही म्हणाले, '' आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे, ते पाहून वाईट वाटतं. ज्या महाराष्ट्रातून समाजवादाचा विचार या अवघ्या देशाला मिळाला त्याच महाराष्ट्रात आज समाजवादाचा विचार लोप पावत चालला आहे. दुसरीकडे, मात्र हे राजकारणी रोज माध्यमांसमोर येऊन एकमेकांना शिव्या घालतायेत. त्याचबरोबर शरद पवार कधीच आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाहीत. पवार नास्तिक आहेत, हे मी बोललो नव्हतो तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्वत:हा संसदेत शरद पवार नास्तिक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झालं.''

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या देशभरात पोहोचवला त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना याच शरद पवारांनी त्यांच्या वृध्दपकाळात त्रास दिला. शरद पवारांना हिंदू शब्दाचीच अॅलर्जी आहे. ज्या महाराष्ट्राने उदात्त विचार दिला, तो महाराष्ट्र आज जातीपातीच्या राजकारणा सडत चालला आहे. लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही. याआगोदरही अनेकांनी हा विषय मांडला होता. मात्र मी त्याला पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत, हे मुस्लिम समाजाने देखील समजून घेतले पाहिजे. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, त्यामुळे त्याला धार्मिक विषय कोणी बनवू नये. जर उत्तरप्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर मग महाराष्ट्रात का नाही? देशात सर्वांना समान धर्म असायला हवा, आम्हीच का भोगायचं? 4 तारखेनंतर महाराष्ट्रात दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठन केलं जाईल.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT