Raigad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad landslide: सह्याद्रीनं गिळलं गाव; पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवीत हानी बरोबर मोठ्याप्रमाणावर वित्तीय हानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवीत हानी बरोबर मोठ्याप्रमाणावर वित्तीय हानी झाली आहे. दुसरीकडे रायगडमधील (Raigad) तळीये गावात दरड कोसळून सुमारे 38 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. महाडमधील नाते रोडवर तळई गावामध्ये दरड कोसळली. याबाबत मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरांवर ही दरड कोसळली असून यामध्ये तब्बल 72 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यामधील तळई येथे रात्री दरड कोसळल्याने 32 घरांची नासधूस झाली आहे. त्यानंतर मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. शिवाय मृत नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु मुसळधार पाऊसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणसह मुंबईकरांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. नुकतीच मुंबईतील गोवंडी परिसरामध्ये एक इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटनुा झाली आहे. यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती मुबंई पोलिसांनी दिली. रायगडमध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी दोन लाखाची मदत तर जखमी झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT