Nitin Gadkari Dainik Gomantak
महाराष्ट्र

…तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा : नितीन गडकरी

दैनिक गोमन्तक

सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांना ऊस शेतीवरुन शेतकऱ्यांना गंभीर ईशारा दिला असून शेती पद्धती बदली नाही तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा असे वक्तव्य केलं आहे.(Nitin Gadkari gave a serious warning to the people of Solapur from sugarcane farming)

या पुढे बोलताना ते म्हणाले की, “सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.ते सोलापूरमध्ये बोलत होते.

शिवाय सोलापूर जिल्हा आणि तेथील परिसर देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता असलेल्या या रस्ते प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि अपघातांच्या घटना कमी होण्यास तसेच पर्यावरणाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे ही ते यावेळी म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले, “आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता.

या वेळी मंत्री गडकरी यांनी 292 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी कारखानदारांना इशारा देताना म्हणाले कि, ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,” असं म्हणत नितीन गडकरी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT