Nitin Gadkari Dainik Gomantak
महाराष्ट्र

…तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा : नितीन गडकरी

ऊस शेतीवरुन सोलापूरकरांना दिला गंभीर इशारा

दैनिक गोमन्तक

सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांना ऊस शेतीवरुन शेतकऱ्यांना गंभीर ईशारा दिला असून शेती पद्धती बदली नाही तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल हा शब्द लक्षात ठेवा असे वक्तव्य केलं आहे.(Nitin Gadkari gave a serious warning to the people of Solapur from sugarcane farming)

या पुढे बोलताना ते म्हणाले की, “सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.ते सोलापूरमध्ये बोलत होते.

शिवाय सोलापूर जिल्हा आणि तेथील परिसर देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता असलेल्या या रस्ते प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि अपघातांच्या घटना कमी होण्यास तसेच पर्यावरणाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे ही ते यावेळी म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले, “आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता.

या वेळी मंत्री गडकरी यांनी 292 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी कारखानदारांना इशारा देताना म्हणाले कि, ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,” असं म्हणत नितीन गडकरी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गुंतवणुकीच्या नावाखाली गोमंतकीयाला 1.64 कोटींचा गंडा; फरिदाबादच्या भामट्याला अटक, गोवा सायबर सेलची हरियाणात कारवाई

T20 World Cup 2026: सिकंदर रझाचा 'विराट' पराक्रम! रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

"विधानसभेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा", स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

Kala Academy: कलेच्या दरबारात लाचेचा बाजार! दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; प्रकरण दडपण्यासाठी 'अकादमी'तच रंगली होती चर्चा

SCROLL FOR NEXT