Mumbai Raid: NCB raid is totally fake Nawab Malik claim Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Raid: NCB ची कारवाई 'फर्जी', नवाब मालिकांचा आरोप

त्या तिघांना कुणाच्या आदेशावरून सोडलं गेलं याचा खुलासा NCB ने करावं असे सांगत नवाब मालिकांनी ही पूर्ण कारवाई खोटी असल्याचं सांगितलं आहे.

दैनिक गोमन्तक

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी NCB ने अकरा जणांना अटक केली होती असे सांगत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अमीर फर्निचरवाला, रिषभ सचदेवा आणि प्रतीक गाभा या तीन आरोपींना का सोडल असा प्रश्न उपस्थित केला आहे. या तीन आरोपींपैकी रिषभ सचदेवा हा भाजप नेते यांचा मेव्हणा आहे. आता या तिघांना कुणाच्या आदेशावरून सोडलं गेलं याचा खुलासा NCB ने करावं असे सांगत नवाब मालिकांनी ही पूर्ण कारवाई खोटी असल्याचं सांगितलं आहे.त्याचबरोबर सेलिब्रिटांना गोवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता असा आरोप देखील त्यांनी केला आहे.(Mumbai Raid: NCB raid is totally fake Nawab Malik claim)

नवाब मलिक यांनी क्रूझवरील छापे बनावट असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण छापा बनावट असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यन खानसोबत काहीही सापडले नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला आहे . प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला त्याला अडकवण्यासाठी तिथे घेऊन गेले. या दोघांनाही सोडण्यात आले.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी रिषभ सचदेवा यांची कांबोज आणि कुटुंबासह चित्रे दाखवली आणि सांगितले की, 1300 लोक असलेल्या क्रूझमधून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आमच्याकडे अशी माहिती आहे की दिल्लीत बसलेले स्थानिक भाजप नेते आणि नेत्यांनी सचदेवा, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या सुटकेसाठी फोन केले. समीर वानखेडे यांना का सोडण्यात आले याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांना सोडण्यापूर्वी त्यांना काय प्रश्न विचारण्यात आले? असा सवाल त्यांनी NCB ला केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT