पुढील 4 ते 5 दिवसांत पाऊस येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय, 4 ते 5 दिवसांत अनेक भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून आलेल्या या गुड न्यूजमुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळणार का ते पुढील चार दिवसांत कसा पाऊस पडतो त्यावरुन समजेल.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) दडी मारलेल्या मॉन्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय (Active) होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तविण्यात आली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत (next 4 to 5 days) पाऊस येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मॉन्सूनसाठी पोषक वातावण निर्माण झाले असून, वाऱ्याचा वेग त्याची दिशा हे अनुकूल झाल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. तर अनेक भागात मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल.

जुनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. परंतु नंतर त्याने मोठा ब्रेक घेतला. जून महिन्याच्या शेवटापर्यंत मॉन्सूनने दडी मारलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगाऊ लागले आहे. त्यातच हवामान विभागाकडून आलेल्या या गुड न्यूजमुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळणार का ते पुढील चार दिवसांत कसा पाऊस पडतो त्यावरुन समजेल.

मुंबईसह महाराष्ट्राततील अनेक भागांत मॉन्सूनने हजेरी तर लावली आहे. गडचीरोलीत तर सुरु असलेल्या जोरदार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मध्य, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अद्याप पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाई देखील जाणवू लागे आहे. त्यामुळे आता जुलैमध्ये कसा पाऊस पडतो हे पहाणे महत्त्वाचे आहे. बळीराजाला देखील याचीच आस लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT