Kolhapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापूरात पाण्याच्या भांड्यासहित महिला रस्त्यावर, नेमकं काय आहे प्रकरण

Kolhapur: हॉकी स्टेडियम परिसरात महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Kolhapur: कोल्हापूरमध्ये पाण्यासाठी महिलांनी रास्तारोखो आंदोलन सुरु केले आहे. हॉकी स्टेडियम परिसरात महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.

प्रशासनाने याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात ,अशी मागणी येथील नागरिकांची आहे. आपल्या मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. महिलांनी हॉकी( Hockey ) स्टेडियम परिसरात पाण्याच्या भांड्यासह रस्त्यावर येत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हॉकी स्टेडियम परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरात काही तांत्रिक अडचणीमुळे एक दिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या हॉकी स्टेडिय़म परिसरात पाणीपुरवठा बंद झाल्याने या परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांना पाणी( Water )पुरवठ्याबाबत विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता महिलांनी थेट रस्त्यावर उतरत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. जोपर्यत आयुक्त याठिकाणी येत नाहीत तोपर्यत आम्ही येथून हलणार नाही. त्याचबरोबर, आजच्या आज आपल्याला पाणीपुरवठा झाला पाहिजे असे महिलांनी म्हटले आहे. कोल्हापुरा( Kolhapur )तील पाण्याचा हा प्रश्न लवकरात लवकर सुटणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

SCROLL FOR NEXT