The journey from Mumbai to Kolhapur will take just six hours 
महाराष्ट्र

कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार फक्त सहा तासांत

गोमन्तक वृत्तसेवा

कोल्हापूर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात फार काही पडलं नसलं, तरी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला यायचा प्रवास हा जलद होणार आहे. काल सादर करण्यत आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी साडे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

देशातील बहुतांश रेल्वे मार्गांवरील रेल्वे या आगीमी काळात वीजेवर चालणार असून, यामुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे. याचा फायदा मुंबई-पुणे-मिरज-कोल्हापूर यादरम्यान येणाऱ्या स्थानकांनादेखील होणार आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन,त्याची चाचणीदेखील घेण्यात आली आहे.  

देशातील रेल्वेंच्या विद्युतीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे देशभरातील बहुतांश रेल्वेचं विद्युतीकरण होण्याची शक्यता असल्यामुळे कोल्हापूर - मिरज रेल्वे वीजेवर धावतील. असे झाल्यास, कोल्हापूर ते  मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार आहे. कोकण रल्वेशी कोल्हापूरला जोडण्याविषय़ी अद्याप तरी काही घोषणा करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Results: ग्रामीण भागात 'कमळ' जोरात! 28 जागांसह भाजपचे निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसची 9 जागांवर समाधान

Rohit Sharma: 'क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला...', निवृत्तीबाबत रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा

Vaidhriti Yog 2026: सूर्य-चंद्राचा शुभ वैधृति योग! 21 फेब्रुवारीपासून 3 राशींच्या आयुष्यात येणार 'सुवर्णकाळ'; व्यवसायातील वाढीसह मिळणार मनशांती

चार्जिंगचं टेन्शन कायमचं मिटणार! 10,000 mAh बॅटरी असलेला 'हा' स्मार्टफोन 26 डिसेंबरला होतोय लाँच, फीचर्स वाचून थक्क व्हाल

Goa ZP Election Results: '2027'ची नांदी? उत्तर गोव्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांची धडपड

SCROLL FOR NEXT