Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांनी राज ठाकरेंना फटकारलं

बाबासाहेब पुरंदरे हे काही फिलॉसॉफर नव्हते - जितेंद्र आव्हाड

दैनिक गोमन्तक

मुंबई : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत भोंगा आणि हनुमान चालिसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. असे ही ठाकरे म्हणालेत. या सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना जेम्स लेन प्रकरणावर ही भाष्य केलं होत. याच मुद्यावरुन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. (Jitendra Awhad criticizes Raj Thackeray )

मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात असतानाच आव्हाड यांनी जेम्स लेन प्रकरण आम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर कधीच चर्चेत आणलं नाही असं म्हटलंय. तसेच आव्हाड यांनी आमचा पुरंदरेंविरोधातील वैचारिक संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आल्याचं म्हटलंय. या सभेदरम्यान ठाकरे यांनी अनेक मुद्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले असून ईद झाल्यानंतर तातडीने पोलीसांनी सामंजस्याने मशीदीवरील भोंगे उतरवावेत अन्यथा या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असं ते म्हणालेत.

तर आव्हाड यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर आम्ही आईसाहेबांच्या चारित्र्याबद्दल बोलणाऱ्या जेम्स लेनचा विषय कधी काढलाच नाही. आमच्या चर्चेतला भागच नाही तो विषय. माणूस जिवंत असताना त्याच्या विचारांशी वैचारिक संघर्ष करायचा असतो,” तेसच बाबासाहेब पुरंदरे हे काही फिलॉसॉफर नव्हते असे ही ते यावेळी म्हणालेत. त्यामूळे राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा तापत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT