Heavy rain Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

कोकणात जगबुडी, सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्ग पावसाची आतूरतेने वाट पाहतो आहे. कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली असल्याने या पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. कारण मानवनिर्मीत पाणी पुरवठा होत असला तरी संपुर्ण कृषी क्षेत्राला पाण्याचा पूरवठा केला जाऊ शकत नाही. पण गेल्या दोन - तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामूळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे. ( Heavy rain in Mumbai, Ratnagiri, Raigad, Kolhapur parts of Maharashtra )

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदी देखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला आहे.

असे चित्र असताना रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदेतर्फे याची नागरिकांना कल्पना देण्यासाठी भोंगा वाजविण्यात आला. रत्नागिरी जिल्हयात सोमवारी मोठ्या पावसामुळे मंडणगड येथेही पावसाने जोर धरला आहे, भिंगळोली समर्थ कृपा अपार्टमेंट समर्थ नगर येथे पाणी आले होते या सगळ्या परिस्थितीवर मंडणगड तालुका प्राशसन लक्ष ठेऊन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

SCROLL FOR NEXT