गिरीश चौधरी यांच्या अटकेमुळे खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर ईडीचा मोर्चा एकनाथ खडसेंकडे

भोसरीतील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल ईडीने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: भोसरीतील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल ईडीने (Ed) अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेमुळे खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

युती सरकारच्या काळात खडसे यांना भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी आपले मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर खडसे आणि त्यांची मुलगी शारदा यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले होते.

त्यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना देखील चौकशीसाठी बोलावले होते. मंगळावारी दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे. चौधरी यांच्या अटकेमुळे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत गेलेले एकनाथ खडसे यांना झटका बसला आहे.

गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या मागे ईडीचे वादळ घोंगावत आहे. कधी माहाविकास आघाडीतील नेते तर कधी त्यांचे नातेवाईक यांच्या मागे हा ईडीचा ससेमीरा लावला जात आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) , प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) आणि आता एकनाथ खडसे यांच्याकडे ईडीचा मोर्चा वळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT