राज्यसभेत यासंदर्भात बोलण्यासाठी मी उराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 50 टक्क्यांची मर्यादा उठविल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे का?

छत्रपाती संभाजीराजेंचा सवाल, अपवादात्मक स्थिती आहे का नाही ते राज्य ठरवू शकते. पण घटनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ते बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आपल्याला राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. काल संसदेत आरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले. याबाबत बोलताना छत्रपाती संभाजीराजेंनी 50 टक्क्यांची मर्यादा (50 percent limit) उठविल्याशिवाय महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे का ? (Is it possible to make a reservation?) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले, अपवादात्मक स्थिती आहे का नाही ते राज्य ठरवू शकते. पण घटनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ते बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात. त्यामुळे अशा अपवादात्मक परिस्थितीत केंद्रानेच 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायला हवे.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली पहिले आरक्षण दिले. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि मराठा समाजाचा समावेश यात होता. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटित केले. 2007 पासूनच आम्ही हा लढ लढत आहोत. मराठा समाजाला त्यांचा न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळेच आज राज्यसभेत यासंदर्भात बोलण्यासाठी मी उराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. तेथे मी माझी भूमिका स्पष्ट पणे मांडेन. तेथे बोलण्याची संधी मला मिळेल, असा विश्वास आहे. बोलण्याबाबत मला अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. असे खासदार संभाजी राजेंनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

SCROLL FOR NEXT