Sambhajiraje Chhatrapati  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बंधने घातली जातात तिथे थांबायचं नसतं - संभाजीराजे छत्रपती

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

दैनिक गोमन्तक

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला ही उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या. "सार्वभौम" स्वराज्य स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास त्रिवार मुजरा असे म्हटले आहे. ( 348th Shiva Rajyabhishek ceremony held at Fort Raigad )

संभाजीराजे छत्रपती यांनी या सोहळ्यास उपस्थित राहात त्यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी बोलताना म्हणाले की, स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु, तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधने घातली जातात तिथे थांबायचं नसतं, अशी महाराजांची शकवण आहे. शिवाजी महाराज यांचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून केला आहे.

कोरोनामूळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती राजकीय वक्तव्ये करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, मी आज राजकीय बोलणार नाही असे स्पष्ट करत संभाजी राजे यांनी यावेळी कोणाचेही थेट नाव घेतले नाही. परंतु, अनेक ऐतिहासिक दाखले देत राज्यसभा निवडणूकीवरुन आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरुन राज्य सरकारवर नाव न घेता टीका केली.

तुम्ही शिवभक्तांसाठी केलं काय ?

मागील दोन वर्षात कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने झाला. त्यावेळी मी रायगडावर येऊ नका अशी हाक दिली होती आणि तुम्ही माझा शब्द ऐकला. हा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, प्रेम आहे. रायगडावर कोणतीही सोय नसताना देखील शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्याला हजर असता. त्यामुळे माझा सरकारला प्रश्न आहे की, तुम्ही शिवभक्तांसाठी काय केलं ? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. सोय होत नसेल तर हा लढा इथूनच सुरु होईल. मग होऊन जाऊ द्या, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला.

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की मी किल्ल्याचं संवर्धन जतन सुरु केलं असून राष्ट्रपतींना देखील शिवाजी महाराजांसमोर आणलं आहे. परंतु, मला कोणी सांगितले की, उद्या राजीनामा द्या तर मी लगेच देईन. मला फरक पडत नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

SCROLL FOR NEXT