Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Malvan Kolhapur Tuljapur Bus Accident: सर्व्हिस रोडवर उभ्या असणाऱ्या कंटेनरला बसने धडक दिल्याने अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident

सिंधुदुर्ग: मुंबई - गोवा महामार्गावरुन कोल्हापूर-तुळजापूरला जाणाऱ्या महामंडळाच्या बसचा कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे. यात २६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

रविवारी (दि.१५ सप्टेंबर) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधुदुर्गातील कसाल डेपोमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी बस रविवारी सकाळी कसाल येथून कोल्हापूर-तुळजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. यात सुमारे ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. बस सर्व्हिस रोडवर येत असताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली.

यात सुमारे २६ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ओरोस येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार जखमी प्रवशांमध्ये कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांकडून याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यात अपघातावेळी उपस्थित असणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

SCROLL FOR NEXT