1000 gelatin sticks and explosives recovered from Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला; बॉम्बच्या साहित्यासह 3 जणांना अटक

25 फेब्रुवारी रोजी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर अँटिलियाच्या जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली एक कार सापडली होती.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या ठाणे (Thane) जिल्हा परिसरात मंगळवारी (1 फेब्रुवारी) सायंकाळी एका कारमध्ये 1000 जिलेटिनच्या काठ्या आणि काही डिटोनेटर्स सापडले. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदी नाका येथे मारुती इको ही कार पकडण्यात आली. या कारमध्ये एक हजार जिलेटिनच्या काठ्या आणि काही डिटोनेटर्स ठेवण्यात आले होते. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी (Police) तपास सुरू केला.

अल्पेश पाटील, पंकज चव्हाण आणि समीर वेदगा अशी घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांचीही चौकशी सुरू आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दरम्यान हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर अँटिलियाच्या जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली एक कार सापडली होती. आणि त्यामुळे अनेक प्रकरणांचा खुलासा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT