Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: कोहलीचं 'विराट' दु:ख! चक्क नवाकोरा मोबाईलच हरवला, म्हणतोय, 'कोणी पाहिलाय का'?

Pranali Kodre

Virat Kohli: कोणताही व्यक्ती कितीही मोठा झाला तरी आपली एखादी गोष्ट हरवली, तर त्याला वाईट वाटतेच. त्यातही ती गोष्ट नवीन असेल, तर त्याचं दु:ख अधिक असतं. असेच दु:ख विराट कोहलीलाही झालं आहे. त्याचा नवाकोरा मोबाईल हरवला आहे.

विराटने त्याचा मोबाईल हरवल्याबद्दल स्वत: माहिती दिली आहे. त्याने ट्वीट केले आहे की 'तुमचा बॉक्सही न उघडलेला नवाकोरा मोबाईल हरवल्याच्या दु:खी भावनेला कोणीही हरवू शकत नाही. कोणी तो पाहिलाय का?'

विराटने हे ट्वीट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून हजारो प्रतिक्रियाही त्याला आल्या आहेत. अनेक युजर्सने काही मजेशीर उत्तरंही त्याला दिली आहेत. झोमॅटोने त्याच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले आहे की 'वहिनींच्या मोबाईलवरून आईसक्रिम मागवागला कचरू नकोस.'

विराट सध्या नागपूरमध्ये भारतीय कसोटी संघाबरोबर आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) खेळायची आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

या मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ नागपूरला पोहचले असून त्यांची तयारी सुरू आहे. दरम्यान, या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी कशी होणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षात आत्तापर्यंत दोन शतकेही केली आहेत. पण ही शतके त्याने वनडेत केली आहेत. तो अद्याप त्याच्या 28 व्या कसोटी शतकाची वाट पाहात आहे. त्याने अखेरचे कसोटी शतक म्हणजेच 27 वे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केले होते. त्यानंतर त्याला गेल्या तीन वर्षात कसोटी शतक करता आलेले नाही.

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत आत्तापर्यंत २० कसोटी सामने खेळले असून 48.05 सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT