WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार  Dainik Gomantak
क्रीडा

भारत विरुध्द इंग्लंड मालिकेपासून WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात

आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून,कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. या दुसऱ्या सत्रात सामना जिंकल्यानंतर जिंकणाऱ्या संघाला 12 गुण देण्यात येणार आहेत. या दुसऱ्या सत्राची सुरुवात भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होणार आहे.

कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण तर मालिका ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना 4-4 गुण देण्यात येणार आहेत. आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात येतील असे या आधीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

4 ऑगस्टला भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरु होत आहे. त्यावेळी याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रत्येक मालिकेचे समान 120 अंक असतील मग ती 2 सामन्यांची असो वा 5 सामन्यांची पुढील सत्रात प्रत्येक सामना समान गुणांचा होईल. संघांनी जिंकलेल्या सामन्यातून त्यांना मिळालेल्या गुणतालिकेनुसार स्थान देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT