WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार  Dainik Gomantak
क्रीडा

भारत विरुध्द इंग्लंड मालिकेपासून WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात

आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून,कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. या दुसऱ्या सत्रात सामना जिंकल्यानंतर जिंकणाऱ्या संघाला 12 गुण देण्यात येणार आहेत. या दुसऱ्या सत्राची सुरुवात भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होणार आहे.

कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण तर मालिका ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना 4-4 गुण देण्यात येणार आहेत. आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात येतील असे या आधीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

4 ऑगस्टला भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरु होत आहे. त्यावेळी याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रत्येक मालिकेचे समान 120 अंक असतील मग ती 2 सामन्यांची असो वा 5 सामन्यांची पुढील सत्रात प्रत्येक सामना समान गुणांचा होईल. संघांनी जिंकलेल्या सामन्यातून त्यांना मिळालेल्या गुणतालिकेनुसार स्थान देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT