Rajasthan Royals
Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 MI vs RR Head to Head: मुंबई-राजस्थान यांच्यात कोण मारणार बाजी?

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये पाच वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. मुंबईला दिल्लीविरुद्ध सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र आता विजयाचं खातं उघडण्यासाठी शनिवारी होणाऱ्या दुहेरी हेडर सामन्यात मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) या सामन्यात कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे, जेणेकरुन या हंगामातील विजयाचे खाते उघडता येईल. मात्र, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ पहिला सामना जिंकल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार असल्याने त्यांच्यासाठी हे सोपे नसणार आहे. (The match between Mumbai Indians and Rajasthan Royals will be played in IPL 2022)

दरम्यान, या मोसमातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. तर मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला. आता दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा राजस्थान आपले मागील रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. आकडेवारीचा विचार करता मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.

जो 25 व्या सामन्यात वरचढ

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएलमधील 26 वा सामना डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या 25 सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास फार कमी फरकाने मुंबई राजस्थानच्या पुढे आहे. मुंबईने 25 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 11 सामने जिंकले आहेत. 2009 मध्ये या दोघांमध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला होता. गेल्या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर साखळी फेरीतील दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने मोठ्या फरकाने जिंकले होते.

दुसरीकडे, खेळाडूंच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमधील 25 सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, ज्याने 416 धावा केल्या आहेत. त्याचवेळी किरन पोलार्ड आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांच्या 316 धावा आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये मुंबईचा धवल कुलकर्णी आघाडीवर आहे, ज्याने राजस्थानविरुद्ध 17 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने राजस्थानविरुद्ध 14 बळी घेतले आहेत. तर जोफ्रा आर्चरने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

शेवटच्या सामन्यात निकाल काय लागला?

शेवटचे दोन्ही संघ शारजाह, UAE मध्ये आमनेसामने आले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानला केवळ 90 धावा करता आल्या. मुंबईतर्फे नॅथन कुल्टर नाइटने चार आणि जेम्स नीशमने तीन बळी घेतले. दुसरीकडे, इशान किशनने 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या, ज्याच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य केवळ 8.2 षटकात पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT