suryakumar yadav Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

T20 World Cup 2026 Super 8 Points Table: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार आता एका निर्णायक आणि अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

Manish Jadhav

ICC T20 WC 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार आता एका निर्णायक आणि अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या फेरीत सहभागी झालेल्या 20 संघांपैकी 12 संघांचे आव्हान आता संपुष्टात आले असून विजेतेपदाच्या शर्यतीत केवळ आठ संघ उरले आहेत. सुपर-8 च्या या फेरीत प्रत्येक सामना सेमीफायनलच्या दिशेने टाकले जाणारे एक पाऊल आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की, आपल्या लाडक्या टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी नेमकी किती विजयांची गरज आहे? या समीकरणावर नजर टाकणे आता अनिवार्य झाले आहे, कारण सुपर-8 मधील प्रत्येक धाव आणि प्रत्येक विजय संघाचे नशीब ठरवणार आहे.

टीम इंडियाचा (Team India) समावेश असलेल्या सुपर-8 च्या गटामध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तीन संघांचे आव्हान आहे. भारताची पहिली लढत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून त्यानंतर संघ झिम्बाब्वेचा सामना करेल. सुपर-8 मधील भारताचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा सामना 1 मार्च रोजी यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध रंगणार आहे.

जर टीम इंडियाने या तिन्ही सामन्यांत विजय मिळवला, तर कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय किंवा दुसऱ्या संघावर अवलंबून न राहता भारत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तीन विजयांचा अर्थ असा की भारताकडे 6 गुण असतील आणि या गटातील इतर कोणताही संघ इतके गुण मिळवू शकणार नाही, ज्यामुळे भारत गटात अव्वल राहील.

मात्र, क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकते. जर भारताने दोन सामने जिंकले आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तरीही सेमीफायनलची दारे पूर्णपणे बंद होणार नाहीत. अशा परिस्थितीत नेट रन रेट हा घटक अत्यंत कळीची भूमिका बजावेल. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण समान झाले, तर ज्या संघाचा नेट रन रेट सरस असेल, त्यालाच सेमीफायनलचे तिकीट मिळेल.

त्यामुळे भारताला (India) केवळ सामने जिंकावेच लागणार नाहीत, तर विजयाचे अंतर मोठे राहील आणि पराभव झालाच तर तो मोठ्या फरकाने होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. जो संघ तीनपैकी केवळ एकच सामना जिंकेल, त्याचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल, कारण केवळ दोन गुणांच्या जोरावर सेमीफायनल गाठणे अशक्यप्राय मानले जाते. आता या कठीण गटातून भारत आणि इतर कोणता संघ बाजी मारुन अंतिम चारमध्ये स्थान मिळवतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Odisha Food Poisoning: दहीवडा खाणं पडलं महागात, 27 बालकांसह 58 जणांना विषबाधा; ओडिशात खळबळ

IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचं भवितव्य दुसऱ्यांच्या हातात, चेन्नईविरुद्धच्या पराभवानं बदललं समीकरण; प्लेऑफच्या आशा धूसर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार! 4 राशींसाठी धनलाभाचा सुवर्णयोग, सूर्याचं नक्षत्र गोचर भाग्याचं; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

जामिनावर सुटताच गौतम खट्टर पत्रकारांवरच घसरला! "गोव्यातील पत्रकारांनी नैतिकता शिकावी" म्हणत उधळली मुक्ताफळे; वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा सापडला वादात

'हिंदू राष्ट्रा'ची संकल्पना आणि अस्पृश्यतेचा जुना प्रश्न; पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत राहिलेल्या हिंदू बांधवांची माफी कोण मागणार?

SCROLL FOR NEXT