T-20 World Cup 2021साठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी  Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup 2021: भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच

T-20 World Cup साठी संघ बदलला जाणार नाही. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांना काढण्याची गरज नाही. चहलने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. पुढील दोन आठवड्यांत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तयार होईल.

दैनिक गोमन्तक

T-20 World Cup 2021: आयपीएलपूर्वी (IPL) भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) आगामी टी- 20 विश्वचषक 2021 साठी आपल्या संघाची घोषणा केली होती. परंतु विश्वचषकाच्या संघात बदलचा आजचा शेवटचा दिवस आहे. चाहत्यांना आयपीएलमधील कामगिरीवर आधारित भारतीय संघात काही बदल पाहायचे आहेत. परंतु त्यांची निराश होताना दिसत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, निवड समितीने भारतीय संघात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यजुवेंद्र चहलबाबत संघ व्यवस्थापनास निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याची देखरेख आता बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाकडून केली जाणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, संघ बदलला जाणार नाही. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांना काढण्याची गरज नाही. चहलने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. परंतु चहरला काही विचारानंतर संघात घेण्यात आले आहे. जर संघ व्यवस्थापनाने विनंती केली तर चहलला दुखापतीची जागा म्हणून यूएईमध्ये थांबवले जाऊ शकते, परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सूर्यकुमार किंवा ईशान किशनचे काय?

सूर्यकुमार आणि ईशान यांनी 30 चेंडूत 80 पेक्षा जास्त धावा केल्या तेव्हा तुम्ही त्यांना खरोखर काढू शकत नाही. जरी त्याने गेल्या अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली नसली तरी त्यांना पुन्हा फॉर्ममध्ये येताना पाहून खूप आनंद होत आहे. श्रेयसने 40 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. पुढील वर्षी आणखी एक विश्वचषक आहे. त्याआधी तो कशी कामगिरी करतो ते आपण पाहून त्याला संघात स्थान देण्यात येईल. सध्याचा भारतीय संघ संतुलित आहे.

हार्दिक पांड्याचे काय होणार?

मुंबई इंडियन्सचा संघ बीसीसीआयच्या संपर्कात आहे. तो पुन्हा शिबिरात येत असून, त्याने तंदुरुस्त देखील आहे. पुढील दोन आठवड्यांत तो तयार होईल अशी अपेक्षा आहे.

एका वृत्तसंस्थेच्या दिलेल्या माहितीनुसार, BCCI च्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणताही बदल होणार नाही. जर एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याच्या जागी बदली खेळाडूची त्याची जागा घेईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने 8 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला होता. ज्यामध्ये अनेक खेळाडूंना वगळल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते. त्यात यजुवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर यांचा देखील संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, राखीव खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

गोवा वीज विभागाचा अलर्ट! उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' भागांत वीज पुरवठा खंडित; दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

SCROLL FOR NEXT