Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: 'भारत पुढच्या आठवड्यात परत येईल...', शोएब अख्तर असं का म्हणाला

ICC T20 World Cup 2022: झिम्बाब्वेविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमन्तक

Shoaib Akhtar On Pakistan: झिम्बाब्वेविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर पाकिस्तान संघावर सर्वत्र टीका होत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून 4 विकेट्सने पराभव झाला होता. आता पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतासोबतच पाकिस्तानही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडेल, असे भाकित केले आहे.

असे शोएब अख्तर यांनी सांगितले

पाकिस्तानच्या (Pakistan) पराभवावर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, 'संघाने कोणतेही नियोजन केले नाही. सलामीवीर आणि मिडिल ऑर्डर प्लॉप ठरली आहे. या सुमार संघाने अत्यंत खराब कामगिरी केली.' त्याचबरोबर त्याने पाकिस्तानच्या पराभवात टीम इंडियालाही (Team India) गुंडाळले. तो पुढे म्हणाला की, 'मी यापूर्वीही सांगितले होते की, पाकिस्तान या आठवड्यात परत येईल आणि भारत पुढच्या आठवड्यात परत येईल. तोही तिसमार खान नाही.'

पीसीबीवर आरोप

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) पुढे म्हणाला की, 'पाकिस्तानकडे खूप वाईट कर्णधार आहे. निवड समितीने सुमार संघाची निवड केली. आसिफ अलीला आठव्या क्रमांकावर उतरवले जात आहे. हैदर अलीच्या भूमिकेबाबत कोणतीही योजना नाही. यंदाच्या टी-20 विश्वषचकात (T-20 World Cup) पाकिस्तानची कामगिरी सुमारच राहीली.'

उपांत्य फेरी गाठणे कठीण

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान सलग दोन सामने हरला आहे. संघाने पहिला सामना भारताकडून 4 विकेटने तर झिम्बाब्वेकडून 1 धावाने गमावला. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. भारतालाही हे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानने 2009 मध्ये एकमेव टी-20 विश्वचषक जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT