Shaheen Shah Afridi | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: विराट की रोहित, कोणाची विकेट आवडली? शाहिन आफ्रिदी म्हणतोय...

Pranali Kodre

Shaheen Shah Afridi revealed favourite Wicket Between Virat Kohli and Rohit Sharma:

शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषकातील सामना होणार होता, पण कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आला. पहिला डाव संपल्यानंतर पावसामुळे पुढे खेळ सुरू होऊ शकला नाही.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर संपला. त्यानंतर पावसामुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सामन्यात प्रथम गोलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यातही शाहिन शाह आफ्रिदीने चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 35 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच 10 पैकी 2 षटके त्याने निर्धाव टाकली.

आफ्रिदीने सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्रिफळाचीत करत भारताला मोठे धक्के दिले होते. दरम्यान, भारताचा डाव संपल्यानंतर आफ्रिदीने त्याला या सामन्यातील आवडलेल्या विकेटबद्दल खुलासा केला होता.

आफ्रिदीने सांगितले, 'आमची नवीन चेंडूसह तिच योजना होती. मला वाटते विराट आणि रोहित दोघांच्याही विकेट्स महत्त्वाच्या होत्या. प्रत्येक फलंदाज माझ्यासाठी सारखाच आहे. पण मला वाटते, मला रोहितची विकेट जास्त आवडली.'

आफ्रिदीने रोहितला पाचव्या षटकात आणि विराटला सातव्या षटकात वेगात चेंडू टाकत त्रिफळाचीत केले होते. तसेच नंतर त्याने 44 व्या षटकात अर्धशतक करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडजेला बाद केले. हार्दिकचा झेल आघा सलमानने घेतला, तर जडेजाचा झेल मोहम्मद रिझवानने घेतला.

विशेष म्हणजे एकाच वनडे डावात विराट आणि रोहित या दोघांनाही त्रिफळाचीत बाद करणारा आफ्रिदी पहिलाच गोलंदाज ठरला.

तसेच आफ्रिदी पुढे म्हणाला, 'आमच्या वेगवान गोलंदाजांच्या योजना यशस्वी ठरल्या. नसीमने ताशी 150 किमीने गोलंदाजी केली, त्याबद्दल खूश आहे. तो खरंच वेगवान होता. नवीन चेंडू कदाचीत स्विंग आणि सीम होत होता, पण त्यानंतर फार काही होत नव्हते. चेंडू जुना झाल्यानंतर धावा करणे सोपे होते.'

दरम्यान, भारताने या सामन्यात 66 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशनने अर्धशतके झळकावण्याबरोबरच 5 व्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडला.

हार्दिक 90 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावा करून बाद झाला आणि इशान 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताची तळातील फलंदाजीही कोलमडली.

पाकिस्तानकडून आफ्रिदीव्यतिरिक्त हॅरिस रौफ आणि नसीम शाह या दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत एका डावातील सर्व 10 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. शाहिन आफ्रिदी, रौफ आणि नसीम हे तिघेही वेगवान गोलंदाज आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. पण अद्याप भारताचा नेपाळविरुद्धचा सामना बाकी आहे. हा सामना सोमवारी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT