Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

T20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या चुकांबाबत रोहीत शर्माने केला मोठा खुलासा

टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार रोहित शर्माने कबूल केले की, ''टी-20 विश्वचषकात भारताचे काही निर्णय चुकीचे ठरले.

दैनिक गोमन्तक

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताने अखेर विजयाची चव चाखली. अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानचा (India v Afghanistan) 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 210 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने 144 धावा केल्या. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचबरोबर त्याचा सलामीचा सहकारी असलेल्या केएल राहुलनेही (KL Rahul) 69 धावांची खेळी उभारली. या दोन फलंदाजांमध्ये 140 धावांची भागीदारी झाली, जी T20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारतासाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी होती. रोहित-राहुलशिवाय हार्दिक पंड्याने नाबाद 35 आणि ऋषभ पंतने नाबाद 27 धावा केल्या.

दरम्यान, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने कबूल केले की, ''टी-20 विश्वचषकात भारताचे काही निर्णय चुकीचे ठरले. परंतु दीर्घकाळ घरापासून दूर राहिल्यामुळे आलेल्या मानसिक थकव्यामुळे हे घडले आहे. अफगाणिस्तानबरोबर झालेल्या सामन्याबाबत आमचा दृष्टिकोन वेगळा असल्याचेही तो यावेळी म्हणाला. मला असे वाटते की आम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्येही असे खेळू शकलो असतो, परंतु तसे झाले नाही आणि जेव्हा आम्ही बराच काळ घरापासून दूर असतो तेव्हा असे घडते. कधी कधी निर्णय चुकतात आणि पहिल्या दोन सामन्यातही असेच घडले.''

रोहित पुढे म्हणाला, "आजकाल खूप क्रिकेट खेळले जात आहे. आम्हीही खूप क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या फ्रेश असल्याची खात्री करुन घेतली पाहिजे. मानसिकदृष्ट्या फ्रेश नसेल तर आपण काही चांगले निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा आपण भरपूर क्रिकेट खेळतो तेव्हा अशा गोष्टी घडतात. कधीकधी मानसिक ताजेतवाने होण्यासाठी खेळापासून दूर जाणे आवश्यक असते, परंतु जेव्हा आपण विश्वचषक खेळत असतो तेव्हा लक्ष केंद्रित करावे. त्यावर तुम्हाला काय करावे आणि काय करु नये हे माहित असले पाहिजे.''

तो पुढे म्हणाला की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चांगले खेळलो नाही, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही रातोरात खूपच सुमार कामगिरी केली. सर्व खेळाडू निरुपयोगी आहेत. तुम्ही आत्मनिरीक्षण करुन परत या आणि आम्ही तेच केले. अशा परिस्थितीत तुम्ही निर्भय राहावे आणि बाहेर काय चालले आहे याकडे लक्ष देऊ नये. आमच्याकडे खूप चांगला संघ आहे जो फक्त दोन सामन्यांत चांगला खेळ करु शकला नाही.

अश्विनकडून फायदा

चार वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकांत 14 धावा देत दोन विकेट घेतल्या. अश्विनच्या कामगिरीबद्दल रोहित म्हणाला की, 'तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, आणि यात शंका नाही. त्याच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. तसेच अनेक विकेट्स घेत विक्रमांची नोंदही केली आहे. चार वर्षांनंतर तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्याने त्याच्यासाठी हे आव्हान असणार हे त्याला माहीत होते. तो नेहमी विकेटच्या शोधात असतो आणि त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे हा एक फायदा आहे. त्याला त्याची गोलंदाजी चांगली समजते आणि त्याने आयपीएलमध्येही चमकदार गोलंदाजी केली आहे.'

रोहित पुढे म्हणाला, " आम्हाला अशी आशा आहे की, तो भविष्यातही आमच्यासाठी गोलंदाजी करत राहील. भारतासाठी उपांत्य फेरीचा रस्ता सध्या कठीण आहे, पण भारत-पाकिस्तान फायनलच्या शक्यतेबद्दल विचारले असता, रोहित म्हणाला की तुम्ही फायनलबद्दल बोलत आहात. कोणाचा रस्ता अजून लांब आहे. अजूनही दूरचे स्वप्न आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT