Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये 'ऑल इज नॉट वेल'? हार्दिक RCBविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर; सूर्याकडेच राहणार कमान

Hardik Pandya ruled out of MI vs RCB 2026: आयपीएल २०२६ चा हंगाम पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी एका भीषण स्वप्नासारखा ठरत आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ चा हंगाम पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी एका भीषण स्वप्नासारखा ठरत आहे. १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीत कसेबसे टिकून असलेल्या मुंबईला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. १९ मे रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यातून कर्णधार हार्दिक पांड्या बाहेर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

मुंबई विमानतळावर हार्दिकची अनुपस्थिती; चर्चांना उधाण

'क्रिकबझ'च्या अहवालानुसार, आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी जेव्हा मुंबई इंडियन्सचा ताफा मुंबई विमानतळावरून रायपूरसाठी रवाना झाला, तेव्हा त्यामध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही. हार्दिक थेट रायपूरमध्ये संघाशी जोडला जाणार की या सामन्याला मुकणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही हार्दिक खेळला नव्हता. त्यावेळी 'बॅक स्पॅजम' (पाण्यातील स्नायूंचे आखडणे) हे त्याच्या न खेळण्याचे अधिकृत कारण सांगितले गेले होते. मात्र, सातत्याने तो मैदानातून बाहेर राहत असल्याने संघामध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

बॅट आणि बॉल दोन्ही विभागात हार्दिक फ्लॉप

कर्णधार म्हणून पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पांड्यासाठी २०२६ चा हंगाम वैयक्तिकरीत्या अत्यंत निराशाजनक ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांत त्याने केवळ १४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३६.४५ इतका सामान्य राहिला आहे.

गोलंदाजीतही तो आपली जादू दाखवू शकलेला नाही; ८ सामन्यांत त्याला केवळ ४ बळी मिळवता आले आहेत. त्याच्या या सुमार कामगिरीमुळे चाहत्यांच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागत आहे.

कॅप्टन म्हणून खराब रेकॉर्ड

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची आकडेवारी पाहिल्यास ती चिंताजनक दिसते. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या ३७ सामन्यांपैकी मुंबईला केवळ १४ विजय मिळवता आले आहेत, तर २३ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जर आरसीबीसारख्या 'करा किंवा मरा' स्वरूपाच्या सामन्यातूनही तो बाहेर राहिला, तर त्याच्या फिटनेसवर आणि संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: बाप्पाची कृपा आणि नशिबाची साथ! आज 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, घरात येईल पैसाच पैसा

Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT