Mumbai Indians playoff qualification chances IPL 2026 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

Mumbai Indian Road to IPL 2026 Playoff: आयपीएल २०२६ चा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (MI) यंदाची वाटचाल अत्यंत खडतर राहिली आहे.

Sameer Amunekar

मुंबई: आयपीएल २०२६ चा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (MI) यंदाची वाटचाल अत्यंत खडतर राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यांत विजय मिळवता आल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. ७ पराभवामुळे मुंबईच्या चाहत्यांच्या मनात 'आता आपले काय होणार?' हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गणिताच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबईचे प्ले-ऑफचे दरवाजे अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. पण, यासाठी मुंबईला केवळ स्वतःच्या खेळावरच नाही, तर नशिबावर आणि इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

विजयी चौकार ठोकणे अनिवार्य

मुंबई इंडियन्सच्या हातात आता केवळ ४ सामने शिल्लक आहेत. आरसीबी (RCB), पंजाब किंग्स, केकेआर (KKR) आणि राजस्थान रॉयल्स या बलाढ्य संघांविरुद्ध मुंबईला भिडायचे आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी मुंबईला हे चारही सामने जिंकावे लागतील. जर एकाही सामन्यात पराभव झाला, तर मुंबईचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल. या विजयांमुळे मुंबईचे एकूण १४ गुण होतील. आयपीएलच्या इतिहासात अनेकदा १४ गुण मिळवून संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत, त्यामुळे ही आशा अजूनही जिवंत आहे.

धावगतीचे मोठे आव्हान

केवळ विजय मिळवून मुंबईचे काम भागणार नाही. मुंबईचा सध्याचा नेट रन रेट उणे (-०.६४९) आहे, जो अत्यंत खराब आहे. १० सामन्यांत केवळ ६ गुण असलेल्या मुंबईला पुढच्या चारही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. जर १४ गुणांवर इतरही संघ असतील, तर ज्याचा रन रेट सरस असेल तोच संघ 'टॉप-४' मध्ये जागा मिळवेल. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमक खेळ करावा लागेल.

इतर संघांच्या कामगिरीवर मुंबईची भिस्त

मुंबईचे नशीब आता दुसऱ्यांच्या हातात आहे. गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्स १३ गुणांसह अव्वल आहे, तर आरसीबी, एसआरएच, राजस्थान आणि गुजरात टायटन्स प्रत्येकी १२ गुणांसह सज्ज आहेत.

विशेष म्हणजे यातील पंजाब आणि आरसीबीने मुंबईपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. मुंबईला जर पुढे जायचे असेल, तर वरच्या फळीतील या संघांनी त्यांचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने हरावेत, अशी प्रार्थना चाहत्यांना करावी लागेल. उदाहरणार्थ, पंजाब किंग्सचे १३ गुण आहेत, जर ते पुढचे सर्व सामने हरले तर त्यांची गाडी १३ गुणांवरच अडकेल आणि मुंबईला १४ गुणांसह पुढे जाण्याची संधी मिळेल.

अत्यंत क्लिष्ट आणि रोमांचक गणित

यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची असल्याने १४ गुण हे 'सेफ' मानले जाऊ शकत नाहीत. वरच्या पाच संघांपैकी कोणत्याही संघाने चांगली कामगिरी केली, तर मुंबईचा मार्ग रोखला जाऊ शकतो. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांसारख्या संघांच्या विजयाचा फायदा मुंबईला होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. थोडक्यात सांगायचे तर, मुंबईला स्वतःचे शंभर टक्के योगदान देऊन नशिबाची साथ मिळण्याची वाट पाहावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT