lsg gt and rr to be reach in ipl 2022 playoffs race between four teams continue Danik Gomantak
क्रीडा

IPL 2022 |3 संघ प्लेऑफच्या शर्यतीत पुढे; इतर संघांची स्थिती घ्या जाणून

या संघांमध्ये चुरशीची लढत

दैनिक गोमन्तक

IPL मध्ये लीग टप्प्यातील एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. यापैकी 55 सामने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणारे संघही दिसू लागले आहेत. त्यापैकी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सने जवळपास प्लेऑफ गाठले आहे. तर राजस्थान रॉयल्सही प्लेऑफ खेळताना दिसत आहे. (lsg gt and rr to be reach in ipl 2022 playoffs race between four teams continue)

या तिन्ही संघांचे प्लेऑफ खेळणे जवळपास निश्चित

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनी 8-8 सामने जिंकले आहेत. लीग टप्प्यातील समीकरणे पाहिल्यास, उर्वरित सामन्यांमध्ये राजस्थान आणि RCB व्यतिरिक्त कोणताही संघ 8 पेक्षा जास्त सामने जिंकू शकणार नाही. लखनौ आणि गुजरातचा नेट रन रेटही इतर संघांपेक्षा चांगला आहे. अशा स्थितीत या दोन्ही संघांचे प्लेऑफ खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. आत्तापर्यंतच्या 14 मोसमात असे दिसून आले आहे की साखळी टप्प्यातील 14 पैकी 8 सामने जिंकणारा संघ नेहमीच प्लेऑफ खेळत आला आहे. या दोन संघांसोबतच राजस्थान रॉयल्सही प्लेऑफमध्ये खेळताना दिसत आहे. राजस्थानने 7 सामने जिंकले असून तीन सामने बाकी आहेत. राजस्थानचा नेट रन रेटही चांगला आहे. अशा परिस्थितीत राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून दूर नाही.

या संघांमध्ये चुरशीची लढत

IPL प्लेऑफमधला चौथा संघ कोणता असेल? यासाठी चार संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. हे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आहेत. बेंगळुरूने 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इतर तीन संघांनी 5-5 सामने जिंकले आहेत. बंगळुरूचे फक्त दोन सामने बाकी असून इतर संघांचे 3-3 सामने शिल्लक आहेत. अशा स्थितीत चौथ्या संघाची प्लेऑफसाठीची शर्यत खूपच मजेशीर असणार आहे.

केकेआर आणि सीएसकेलाही संधी

उर्वरित सामन्यांची समीकरणे पाहिल्यास 7 सामने जिंकूनही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. केकेआर आणि सीएसकेने आतापर्यंत 4-4 सामने जिंकले आहेत. त्यांचे अजून 3-3 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. मात्र, त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्स बाहेर

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्याने आपले उर्वरित 4 सामने जिंकले तरी त्याचा एकूण विजय केवळ 6 होईल. सध्या फक्त टॉप-4 मध्ये समाविष्ट असलेल्या संघांनी 7 किंवा 7 पेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई यावेळी आयपीएलमधून बाहेर पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खोटा जबाब, बनावट आरोप आणि प्रियकराला तुरुंगाची हवा! लग्नासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचा 'ट्रॅप'? 'पोक्सो' कोर्टाचा मोठा निकाल

Women Reservation Bill: काँग्रेसकडून महिला शक्तीचा 'विश्वासघात'! दामू नाईकांचा हल्लाबोल; महिला मोर्चातर्फे पणजीत ‘जन आक्रोश’ रॅली

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

Women Reservation Bill: भाजपचा 'महिला कार्ड' खेळण्याचा डाव? डॉ. अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल! "आरक्षणाची एवढीच ओढ असेल, तर सीमांकनाची वाट का पाहताय?"

SCROLL FOR NEXT