Harbhajan Singh  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: भज्जी भडकला अन् कुलदीपबाबत थेटच बोलला

Harbhajan Singh: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे. संघ निवडीवरुन अनेक माजी दिग्गजांनी संताप व्यक्त केला आहे. भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, 'कुलदीपला संघातून वगळण्याचा निर्णय अविश्वसनीय आहे.' त्याचबरोबर हरभजन सिंगनेही नाराजी व्यक्त केली आहे. भज्जी म्हणाला की, 'कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार घेणे थांबवावे किंवा त्याने एका सामन्यात 5 विकेट घेणे थांबवावे.'

हरभजनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मला वाटते कुलदीप यादवने आता 5 विकेट घेणे थांबवले पाहिजे. कुणास ठाऊक, असे केल्याने त्याला सलग दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळेल.' वास्तविक, कुलदीप यादव 22 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट ब्रिगेडमध्ये परतला आहे.

तसेच, कुलदीपने चितगाव येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 8 बळी घेतले आणि 40 धावांची उत्कृष्ट खेळीही खेळली. त्याची कामगिरी पाहता त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला.

शानदार खेळीनंतरही 2 वर्षे वाट पाहावी लागली

कुलदीपला संघातून वगळण्यात आल्याने हरभजन सिंग चांगलाच संतापलेला दिसत होता. तो म्हणाला की, 'चितगाव कसोटीपूर्वी त्याने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करत 5 विकेट घेतल्या होत्या. परदेशी भूमीवर तो नंबर वन फिरकीपटू असायला हवा होता पण त्याऐवजी त्याला पुढचा सामना खेळण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. दोन वर्षांनंतर संधी मिळूनही त्याला केवळ एका सामन्यानंतर काढून टाकण्यात आले. यामागील कारण जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल.'

'अनेक खेळाडूंना 5 वर्षे संधी मिळाली, पण...'

हरभजन पुढे म्हणाला की, 'मला कोणत्याही खेळाडूचे नाव घ्यायचे नाही, पण कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंना बराच काळ संधी मिळाली, अनेक खेळाडूंना 5 वर्षांपर्यंत संधी दिली गेली. मात्र, कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बाबतीत सुरक्षेचा कालावधी केवळ 15 दिवसांचा असल्याचे दिसून येत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT