Harbhajan Singh  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: भज्जी भडकला अन् कुलदीपबाबत थेटच बोलला

Harbhajan Singh: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे. संघ निवडीवरुन अनेक माजी दिग्गजांनी संताप व्यक्त केला आहे. भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, 'कुलदीपला संघातून वगळण्याचा निर्णय अविश्वसनीय आहे.' त्याचबरोबर हरभजन सिंगनेही नाराजी व्यक्त केली आहे. भज्जी म्हणाला की, 'कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार घेणे थांबवावे किंवा त्याने एका सामन्यात 5 विकेट घेणे थांबवावे.'

हरभजनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मला वाटते कुलदीप यादवने आता 5 विकेट घेणे थांबवले पाहिजे. कुणास ठाऊक, असे केल्याने त्याला सलग दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळेल.' वास्तविक, कुलदीप यादव 22 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट ब्रिगेडमध्ये परतला आहे.

तसेच, कुलदीपने चितगाव येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 8 बळी घेतले आणि 40 धावांची उत्कृष्ट खेळीही खेळली. त्याची कामगिरी पाहता त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला.

शानदार खेळीनंतरही 2 वर्षे वाट पाहावी लागली

कुलदीपला संघातून वगळण्यात आल्याने हरभजन सिंग चांगलाच संतापलेला दिसत होता. तो म्हणाला की, 'चितगाव कसोटीपूर्वी त्याने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करत 5 विकेट घेतल्या होत्या. परदेशी भूमीवर तो नंबर वन फिरकीपटू असायला हवा होता पण त्याऐवजी त्याला पुढचा सामना खेळण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. दोन वर्षांनंतर संधी मिळूनही त्याला केवळ एका सामन्यानंतर काढून टाकण्यात आले. यामागील कारण जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल.'

'अनेक खेळाडूंना 5 वर्षे संधी मिळाली, पण...'

हरभजन पुढे म्हणाला की, 'मला कोणत्याही खेळाडूचे नाव घ्यायचे नाही, पण कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंना बराच काळ संधी मिळाली, अनेक खेळाडूंना 5 वर्षांपर्यंत संधी दिली गेली. मात्र, कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बाबतीत सुरक्षेचा कालावधी केवळ 15 दिवसांचा असल्याचे दिसून येत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT