IPL Impact Player Rule Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट' खेळाडू नकोसाच, स्पर्धेतील सहभागी संघ कर्णधारांच्या बैठकीतील सूर; नियम 2027 पर्यंत कायम

IPL Impact Player Rule 2027: आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाचे समर्थन करणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मुंबई: आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाचे समर्थन करणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या दहा संघांच्या कर्णधारांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत ‘इम्पॅक्ट’ खेळाडूचा नियम नकोसाच असल्याचा सूर उमटला आहे; मात्र बीसीसीआयकडून हा नियम २०२७पर्यंत कायम ठेवण्यात आल्यामुळे कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली.

आयपीएल सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले, की आयपीएलमधील सहभागी बहुतांशी कर्णधारांकडून ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे; मात्र बीसीसीआयकडून हा नियम २०२७पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्णधारांना सांगण्यात आले आहे, की या नियमाचे पुनरावलोकन २०२७नंतर करण्यात येईल.

याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल याने ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याने पत्रकार परिषदेत याबाबत मत व्यक्त करताना म्हटले, की संघामध्ये अष्टपैलू खेळाडूला याआधी प्राधान्य देण्यात येत होते; पण आता संघ व्यवस्थापनाला अष्टपैलू खेळाडूची गरजच वाटत नाही. मी स्वत: एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे ‘इम्पॅक्ट’ खेळाडूचा नियम मला पसंत नाही.

रोहित शर्मा याने २०२४मध्ये ‘इम्पॅक्ट’ खेळाडूबाबत आपले मत परखड शब्दांत व्यक्त करताना म्हटले, की मी ‘इम्पॅक्ट’ खेळाडू या नियमाचा चाहता नाही. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूच्या विकासामध्ये बाधा येत आहे. याशिवाय हार्दिक पंड्या व ग्लेन फिलिप्स या खेळाडूंकडूनही ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत निराशा व्यक्त करण्यात आली होती.

सर्व कर्णधारांनी २०२६च्या हंगामासाठी जारी केलेल्या सरावाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल आयपीएल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. फ्रँचायझींना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सामन्याच्या दिवशी सरावाला परवानगी दिली जाणार नाही आणि जर एका संघाने आपला सराव लवकर संपवला, तर दुसऱ्या संघाला सरावासाठी खेळपट्ट्या वापरण्याची परवानगी नाही. कर्णधारांना सरावाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक स्पष्टता हवी होती आणि ती त्यांना देण्यात आली, असेही सूत्राने सांगितले.

पहिल्या डावातही चेंडू बदलण्याची मागणी

बीसीसीआयकडून मागील मोसमात दुसऱ्या डावातील दहा षटकांनंतर चेंडू बदलण्यात येण्यासाठी मुभा देण्यात आली. मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एका कर्णधाराने पहिल्या डावातील दहा षटके पूर्ण झाल्यानंतर चेंडू बदलण्याची मागणी केली. सूत्रांकडून याबाबत सांगण्यात आले, की पहिल्या डावातील दहा षटकांनंतर चेंडू बदलण्यात येण्याची मागणी करण्यात आली; पण या मागणीला अधिक प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT