Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील पहिला देश

Manish Jadhav

IND vs AUS, 4th Test: टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिका 2-1 अशी जिंकली आहे. अहमदाबादमध्ये खेळलेला चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला, यासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2-1 ने जिंकली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून टीम इंडियाने मोठा विक्रम केला आहे. असे करणारा भारत (India) हा जगातील पहिला देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांच्या नावावर हा महान विक्रम कधीच नोंदवला गेला नाही, जो टीम इंडियाने अहमदाबादमध्ये आपल्या नावावर जोडला.

असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला

टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2-1 ने जिंकून एक मोठा विक्रम केला आहे. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आणि मायदेशात सलग 16वी कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे, जो एक विश्वविक्रम आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. यानंतर टीम इंडियाने दिल्लीत खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना 6 गडी राखून जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली.

शिवाय, इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत 9 गडी राखून विजय मिळवला. शेवटी, चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला, ज्यामुळे भारताने ही चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली.

टीम इंडियाने इतिहास रचला

नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो.

तसेच, मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे. मायदेशात झालेल्या गेल्या 46 कसोटी सामन्यांमध्ये भारताने केवळ 3 सामने गमावले आहेत. भारतीय कसोटी संघासाठी संपूर्ण भारत हा बालेकिल्ला आहे.

त्याचबरोबर बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन भारतीय संघाने मायदेशात सलग 16वी कसोटी मालिका जिंकली आहे. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाच्या आसपासही एकही संघ नाही.

भारतीय भूमीवर सलग 16 कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे.

1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (4) (2013)

2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2013)

3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (4) (2015)

4. न्यूझीलंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2016)

5. इंग्लंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 4-0 (5) ने जिंकली (2016)

6. बांगलादेश विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2017)

7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-1 (4) ने जिंकली (2017)

8. श्रीलंका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (3) (2017)

9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2018)

10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2018)

11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2019)

12. बांगलादेश विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 (2) ने जिंकली (2019)

13. इंग्लंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-1 (4) ने जिंकली (2021)

14. न्यूझीलंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 (2) ने जिंकली (2021)

15. श्रीलंका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2022)

16. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-1 (4) ने जिंकली (2023)

2013 पासून मायदेशात (कसोटी क्रिकेटमध्ये) भारताचा विक्रम

सामने - 46

विजय - 36

पराजय - 3

ड्रा - 7

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT