Indian Cricket Team | Asian Games Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: जयस्वालच्या धमाक्यानंतर गोलंदाजांनीही दाखवली चमक! टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

India Cricket Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Pranali Kodre

India men's Cricket team won Quarter Final Match against Nepal by 23 runs: चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशिआई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळविरुद्ध 23 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह भारताने पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय देखील ठरला आहे.

उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नेपाळसमोर विजयासाठी 203 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळ संघाला 20 षटकात 9 बाद 179 धावाच करता आल्या.

नेपाळकडून कुशल भुर्टेल आणि असिफ शेख यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, असिफ चौथ्याच षटकात 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल भुर्टेल (28) आणि कुशल मल्ला (29) यांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट्स गमावल्या. कर्णधार रोहित पौडेल ३ धावांवरच बाद झाला.

भारताकडून आर साई किशोर, अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी वरच्या फळीला धक्के दिल्यानंतर मात्र, दिपेंद्र सिंग आणि संदीप जोरा यांनी 45 धावांची भागीदारी करत नेपाळला 120 धावांचा टप्पा पार करून दिला.

त्यांची जोडी जमली असतानाच बिश्नोईने दिपेंद्रला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर संदीपही 29 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र, नेपाळची खालची फळी झटपट बाद झाली आणि भारताने विजय मिळवण्यात यश मिळवले.

भारताकडून अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर आर साईकिशोरने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फायदा घेत यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत भारताला दमदार सुरुवात दिली. त्याला दुसऱ्या बाजूने कर्णधार ऋतुराज गायकवाडने संयमी साथ दिली.

या दोघांनी पहिल्या 10 षटकांच्या आतच शतकी भागीदारी केली होती. पण ऋतुराज 25 धावांवर 10 व्या षटकात बाद झाला. त्याच्यापाठोपाठ तिलक वर्मा (2) आणि जितेश शर्मा (5) हे देखील स्वस्तात बाद झाले.

मात्र, दुसऱ्या बाजूने शानदार खेळ करणाऱ्या जयस्वालने शतक पूर्ण केले. तो आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला. मात्र शतकानंतर त्याला लगेचच दिपेंद्र सिंगने बाद केले. जयस्वालने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली.

त्यानंतर शिव दुबे आणि रिंकू सिंग यांनी अखेरीस आक्रमक खेळत भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 202 धावा केल्या. शिवम दुबेने 19 चेंडूत 25 धावा केल्या, तर रिंकूने 15 चेंडूत नाबाद 37 धावा फटकावल्या.

नेपाळकडून दिपेंद्र सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच सोमपाल कामी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT