Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: चुकीला माफी नाही! पराभवानंतर आता ICC ची टीम इंडियावर कारवाई

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाकडून झालेल्या चूकीसाठी आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Team India: रविवारी भारताने बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताला 1 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पण आता याबरोबरच भारताला या सामन्यातील आणखी एक चूक महागात पडली आहे.

या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने 4 षटके सामनाधिकारी रंजन मदुगल्ले यांनी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा उशीरा टाकली.

आयसीसीच्या (ICC) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार प्रत्येक षटकाच्या कमी गतीमागे खेळाडूंच्या सामनाशुल्काच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे भारतीय संघाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चूक मान्य केली आहे. भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप मैदानातील पंच मायकल गॉफ आणि तन्वीर अहमद, तसेच तिसरे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी ठेवला होता.

दरम्यान, भारतीय संघ पहिल्या वनडेत पराभूत झाल्याने मालिकेतही 0-1 असा पछाडला आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर भारताला 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT