Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Harmanpreet Kaur: निराशा तर येणारच! ऐन मोक्याला रनआऊट झालेल्या हरमनचा राग अनावर, बॅट फेकतानाचा Video Viral

महिला टी20 वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये अर्धशतकानंतर धावबाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरला राग अनावर झाला होता.

Pranali Kodre

Harmanpreet Kaur Run Out: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात गुरुवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी अवघ्या 5 धावांनीं विजय मिळवत सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली.

दरम्यान, भारतीय महिलांचे आव्हान मात्र या पराभवामुळे संपुष्टात आले. या सामन्याला भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटने कलाटणी मिळाली होती. ऐन मोक्याच्या क्षणी तिची विकेट गेल्याने ती प्रचंड चिडलीही होती.

या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने बेथ मुनी (54), मेग लेनिंग (49*) आणि ऍश्ले गार्डनर (31) यांनी केलेल्या आक्रमणामुळे भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 28 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

पण त्यानंतर जेमिमाह रोड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरने भारताचा डाव सांभाळलाच नाही, तर भारताच्या विजयाच्या आशाही जिवंत केल्या. मात्र, 69 धावांची भागीदारी झाली असताना जेमिमाह 43 धावांवर बाद झाली. पण त्यानंतरही हरमनप्रीतने चांगला खेळ करत तिचे अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर ती दुर्दैवीरित्या बाद झाली.

झाले असे की ऋचा घोषबरोबर फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात दुहेरी धावा घेण्याचा तिने प्रयत्न केला. पण दुसरी धाव पूर्ण करत असताना क्रिजच्या काही अंतरावर असतानाच तिची बॅट अडकली आणि ती क्रिजमध्ये वेळेत पोहचू शकली नाही. तिने दुसरी धाव पूर्ण करण्याच्या आतच ऍश्ले गार्डनरच्या थ्रोवर यष्टीरक्षक एलिसा हेलीने तिला 52 धावांवर धावबाद केले होते.

त्यामुळे तिला भारताला विजयासाठी 32 चेंडूत केवळ 40 धावांची गरज असताना माघारी परतावे लागले. ती मैदानावर स्थिरावली होती आणि चांगल्या लयीतही होती. अशा परिस्थितीत मोक्याच्या क्षणी धावबाद झाल्याने ती प्रचंड नाराज दिसली. तिने बाद झाल्यानंतर तिची बॅटही खाली आपटली आणि दूरही फेकली. तिच्या चिडण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरलही होत आहे.

दरम्यान, तिची विकेट या सामन्याला मोठे वळण देणारी ठरली. कारण ती खेळपट्टीवर असेपर्यंत भारतासाठी सोपा वाटणारा विजय कठीण बनला. तिच्यानंतर भारताने ऋचा घोष (14), स्नेह राणा (11) आणि राधा यादव (0) यांच्या विकेट्सही गमवाल्या. अखेर दीप्ती शर्मा 20 धावांवर नाबाद राहिली. पण तरी भारताला विजयासाठी केवळ 6 धावा कमी पडल्या. भारतीय संघ 20 षटकात 8 बाद 167 धावाच करू शकला.

या सामन्यानंतर हरमनप्रीत भावूकही झाली होती. तिला अश्रू रोखणेही कठीण झाले होते. तसेच तिने तिच्या विकेटबद्दल बोलताना असेही म्हटले की यापेक्षा अधिक दुर्दैवी काही नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT