Axar patel Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: वेस्ट इंडिज विरूध्द मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकला.

दैनिक गोमन्तक

BCCI: टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी भेद्य आघाडी घेतली आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या हा सामना भारताने जिंकला. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली की, वेस्ट इंडिजचा संघ पाहतच राहिला आणि भारताने हरलेला सामना जिंकला.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने अवघ्या 35 चेंडूत 64 धावा केल्या. यामध्ये त्याच्या नावावर 3 चौकार, 5 षटकारांचा समावेश आहे. भारताला शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती, इथे पहिले दोन रन एक-एक आशे आले आणि नंतर अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकला.

अक्षर पटेलच्या फटकेदार खेळी मुळे शेवटच्या 10 षटकात भारताला विजयासाठी 100 धावांची गरज होती, ती टीम इंडियाने गाठली.

टीम इंडियाने शेवटच्या 10 षटकात 100 धावा केल्या आणि सामना जिंकला. शेवटच्या 10 षटकांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी पाठलाग केला.

धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे, ज्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 10 षटकात 109 धावा देऊन विजय मिळवला. आता या यादीत भारताचे नावही सामील झाले आहे. भारताने याआधी 2015 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या 10 षटकांत 91 धावा करून विक्रम केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT