Ind Vs Pak Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Pak: पाकिस्तानचा पुन्हा पराभव होणार! आशिया चषकात भारत-पाक पुन्हा आमने-सामने येणार

आशिया चषक 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियाने आपल्या मिशनची सुरुवात विजयाने केली आहे. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला (INDvsPAK) पाच विकेट्सने पराभूत करून आपल्या मिशनला सुरुवात केली. यादरम्यान चाहत्यांना रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, कारण बऱ्याच दिवसांनी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. मात्र आता या दोन संघांची पुन्हा टक्कर पाहण्यासाठी चाहत्यांना फार काळ थांबावे लागणार नाही. कारण या आशिया कपमध्ये आणखी दोन प्रसंग आहेत, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो.

आशिया कपचे पॉइंट टेबल काय आहे?

आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ खेळत असून 3-3 अशा दोन गटात विभागले गेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग अ गटात आहेत. तर अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात आहेत. अ गटात भारत सध्या नंबर-1, पाकिस्तान नंबर-2 आणि हाँगकाँग नंबर एकवर आहे. आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना हाँगकाँगशी मुकाबला करायचा आहे, दोन्ही संघांनी सामना जिंकल्यानंतर पॉइंट टेबलचे चित्र स्पष्ट होईल, त्यात भारत पहिल्या क्रमांकावर असेल, तर पाकिस्तान त्यांच्या गटात दुसऱ्या क्रमांकावर असेल.

भारत-पाकिस्तान कसा भिडणार?

साखळी सामन्यानंतर, सुपर-4 टप्पा सुरू होईल, जिथे आपापल्या गटातील टॉप-2 संघांचे सामने होतील. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात. कारण इथे A1 आणि A2 संघाचा सामना होणार आहे. त्यामुळे या रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता पुन्हा एकदा जगाला भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध पाहायला मिळणार आहे.

या सामन्याशिवाय भारताला सुपर-4 टप्प्यात आणखी दोन सामने खेळावे लागणार आहेत, जे बांगलादेश-श्रीलंका किंवा अफगाणिस्तानविरुद्ध असू शकतात. भारतीय संघाने हे सामने जिंकल्यास अंतिम फेरी गाठू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानलाही या संघांविरुद्ध लढावे लागणार असल्याने त्यांनाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. म्हणजेच आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तानचे संघही आमनेसामने येऊ शकतात. जे दुबईमध्ये 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता, म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी ज्या मैदानावर भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते त्याच मैदानावर होणार आहे.

भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 147 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या, प्रत्युत्तर म्हणून भारताने शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. भारतासाठी, अष्टपैलू हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली, त्याने प्रथम तीन बळी घेतले आणि नंतर 17 चेंडूत 33 धावा केल्या. हार्दिकने अखेर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाचा हिरो म्हणून उदयास आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT