Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG 5th Test: धरमशालामध्ये भारताला मोठी संधी; टीम इंडिया करणार 112 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी?

IND vs ENG Dharamshala: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे.

Manish Jadhav

IND vs ENG Dharamshala: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-1 ने आघाडीवर आहे. पहिल्या 4 पैकी 3 कसोटी जिंकून टीम इंडियाने इंग्लंडचा चांगलाच समाचार घेतला.

आता टीम इंडियाची नजर धरमशाला कसोटीत विजयाकडे आहे. टीम इंडिया 2017 नंतर येथे कसोटी सामना खेळणार आहे. गेल्या वेळी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर येथे एकही कसोटी खेळली गेली नाही. आता क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट येथे परतत असल्याने चाहत्यांना टीम इंडियाचा विजय पाहायचा आहे.

रोहित शर्माच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. त्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय संघाला पुनरागमन करणे कठीण जाईल, असे बोलले जात होते. अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण रोहित शर्माची टीम इंडिया मागे हटली नाही. पुढचे तीन सामने जिंकून टीम इंडियाने आपली प्रतिभा सिद्ध करुन दाखवली. भारताने मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली असून आता संघ 4-1 अशा फरकाने मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल.

पाचवी कसोटी जिंकून भारत विशेष कामगिरी करेल

टीम इंडियाने धरमशाला येथील पाचवा कसोटी सामना जिंकल्यास एका विशेष विक्रमाची बरोबरी होईल. आतापर्यंत, कसोटी इतिहासात असे केवळ 3 वेळा घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर 4-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे.

इंग्लंडने 112 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. योगायोगाने आता भारत त्याच्याविरुद्ध हा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडने 1912 मध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने दोनदा अशी कामगिरी केली आहे. 1897/98 आणि 1901/02 मध्ये 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी मालिका 4-1 ने जिंकली.

मालिकेत आतापर्यंत काय घडलंय?

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने 28 धावांनी जिंकली. त्यानंतर भारताने पुनरागमन केले. टीम इंडियाने विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली. राजकोटमधील तिसरी कसोटी त्याने 434 धावांनी जिंकली.

रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने पाच गडी राखून विजय मिळवला. भारताने घरच्या मैदानावर सलग 17 वी मालिका जिंकली आहे. 22 फेब्रुवारी 2013 पासून भारताने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT