West Indies vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

'13 मिनिट' अन् वेस्ट इंडिजने बांगलादेशला 2 सामन्यांच्या मालिकेतून काढले बाहेर

वेस्ट इंडिजने दुसरी कसोटी अवघ्या 13 मिनिटांत जिंकली.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजने (West Indies) बांगलादेशविरुद्धची (Bangladesh) 2 सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. वेस्ट इंडिजने दुसरी कसोटी अवघ्या 13 मिनिटांत जिंकली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, टेस्ट मॅच 5 दिवसांची आहे, मग कॅरेबियन टीम 13 मिनिटात कशी जिंकली? त्यामुळे हा कसोटी सामनाही पूर्ण 5 दिवस चालला, पण यामध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी जे लक्ष्य ठेवले होते, ते त्यांनी अवघ्या 13 मिनिटांमध्येच पूर्ण केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेस्ट इंडिजलाही 13 धावांचे लक्ष्य मिळाले होते. म्हणजेच कॅरेबियन संघाने 13 मिनिटांत 13 धावा केल्या आणि दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशला पराभव स्विकारावा लागला. ()

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. यासोबतच वेस्ट इंडिजने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप केला. वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना 7 विकेटने जिंकला होता तर संघाच्या विजयात त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीचे वर्चस्व होते. बांगलादेशचा संघ संपूर्ण मालिकेत कॅरेबियन संघाविरुद्ध बॅकफूटवर दिसून येत होता. बांगलादेशच्या मालिकेत पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची फलंदाजी.

वेस्ट इंडिजने 13 मिनिटांत विजयासाठी 13 धावा केल्या

बांगलादेशने यजमान वेस्ट इंडिजसमोर केवळ 13 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांचे सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट आणि जॉन कॅम्पबेल यांनी मिळून केवळ 13 मिनिटांच्या फलंदाजीने पूर्ण केले आणि यादरम्यान कॅरेबियन संघाची एकही विकेट पडली नव्हती तर त्यांनी 10 गडी राखून विजय मिळवला.

बांगलादेशचा दुसरा डाव 186 धावांत आटोपला

दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या फलंदाजीची अवस्था वाईट दिसून आली. परिस्थिती इतकी वाईट होती की 3 जणांना खाते उघडणे कठीण झाले होते, तर 3 जणांना दहाचा आकडाही गाठता आला नाही. दुसऱ्या डावातील सर्वात मोठी धावसंख्या बांगलादेशच्या नरुल हसनने 60 धावा केल्या. एकंदरीत बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 186 धावांवरच आटोपला. म्हणजेच संघाला 200 धावाही करता आल्या नाहीत. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात केमार रोच, जिडेन सिल्स आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

काइल मायर्स प्लेअर ऑफ द सिरीज

बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावामध्ये वेस्ट इंडिजने 174 धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशने प्रथम खेळताना पहिल्या डावामध्ये 234 धावा केल्या होत्या. काइल मायर्सच्या 146 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने स्कोअर बोर्डवर 408 धावांची भर घातली. काइल मायर्सला केवळ दुसऱ्या कसोटीत सामनावीर म्हणून घोषित केले गेले नाही तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याला मिळाला. 2-कसोटी मालिकेत बॅटने 156 धावा करण्यासोबतच त्याने बॉलसह 6 विकेट्स देखील घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"फायनलमध्ये भारताशी सामना झाला, तर काय करणार?" स्वतःच्याच बोर्डाविरोधात उभा ठाकला पाकिस्तानी खेळाडू, 'बॉयकॉट'वरून 'PCB'ला खडे बोल

Shukra Rahu Yuti 2026: फेब्रुवारीत नशिबाची साथ! शुक्र-राहूच्या युतीने 'या' 3 राशी होणार मालामाल, अडकलेली कामं पूर्ण होणार

BITS Pilani: सहावा बळी! "आता आश्वासनं नको, न्यायालयीन चौकशी हवी", बिट्स पिलानीतील मृत्यूच्या सत्रावरून पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल

Goa Accident: वळणावर दुचाकी घसरली अन् दोन्ही पाय तुटले, झुआरी पुलावर भयंकर अपघात! 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND VS PAK: मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! वैभव सूर्यवंशी पाकिस्तानच्या फलंदाजावर भडकला; उपकर्णधाराला करावा लागला हस्तक्षेप VIDEO

SCROLL FOR NEXT