Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024 साठी या खेळाडूला टीम इंडियाचा कर्णधार बनवा, दिग्गजांची मागणी

Indian Captain: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली.

दैनिक गोमन्तक

Indian Team: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता भारताचा माजी स्फोटक सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या स्टार खेळाडूला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया...

श्रीकांत यांनी हे निवेदन दिले

माजी क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हणाले की, '2024 च्या विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार बनवावे.' ते पुढे म्हणाले की, ''संघाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली पाहिजे. हे काम आठवडाभरात सुरु होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेपासून सुरु व्हायला हवे.''

आता सुरुवात करावी लागेल

कृष्णमाचारी श्रीकांत पुढे म्हणाले की, 'तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायची आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्यासाठी दोन वर्षे आधीच तयारी सुरु करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे आहे, मग तो कुठलाही प्रयोग असो किंवा काही, तो वर्षभरात करा. मात्र 2023 पर्यंत संघ तयार करा, आणि हा संघ विश्वचषकात खेळेल याची खात्री करा.'

हार्दिक पांड्या कर्णधार

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मालिकेत भारत तीन टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT