Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऋतुराज गायकवाड कोरोनातून झाला बरा

संघाच्या या शानदार कामगिरीदरम्यान एक आनंदाची बातमीही समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवत मालिका जिंकली. आता भारतीय संघ क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी मालिकेतील शेवटच्या सामन्यात उतरणार आहे. संघाच्या या शानदार कामगिरीदरम्यान एक आनंदाची बातमीही समोर आली आहे. कोरोना (Corona) संसर्गाच्या विळख्यात सापडलेला संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आता यातून पूर्णपणे बरा झाला आहे. (Ruturaj Gaikwad Latest News)

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, संघाचा बॅकअप सलामीवीर म्हणून निवडलेला ऋतुराज गायकवाड आता संसर्गातून पूर्णपणे बरा झाला आहे आणि अलगावातून बाहेर आला आहे आणि संघात सामील झाला आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यरसह ऋतुराजला वनडे मालिकेपूर्वी संसर्ग झाल्याचे आढळले होते. धवन आणि श्रेयस आधीच संघात सामील झाले आहेत.

मात्र, असे असूनही ऋतुराज तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत खेळण्याची शक्यता नाही. याची दोन कारणे आहेत - एक म्हणजे तो संसर्गातून नुकताच बरा झाला आहे आणि त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी त्याला थेट सामन्यात मैदानात उतरवण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने आधीच घोषणा केली आहे आणि शिखर धवन तिसऱ्या वनडेसाठी परतणार आहे.

गतवर्षी श्रीलंका दौऱ्यावर टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराजला अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करायचे असून त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्याची टी-20 मालिकेसाठीही निवड झालेली नाही आणि अशा परिस्थितीत तो आता रणजी ट्रॉफीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या संघात सामील होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT